HW News Marathi
देश / विदेश

शिवसेना-राष्ट्रवादी शेतकरी विधेयकावरून राज्यसभेत भाजपची कोंडी करणार ?

मुंबई । मोदी सरकारच्या शेतकरी विधेयकाबाबत शिवसेना आपली भूमिका बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. भाजपच्या शेतकरी विधेयकांना लोकसभेत पाठिंबा दिल्यानंतर आज (२० सप्टेंबर) राज्यसभेत मात्र शिवसेना आपली भूमिका बदलणार असल्याचे म्हटले जात आहे. “सरकारने ही शेतकरी विधेयके ही संसदीय समितीकडे पाठवावीत”, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याची माहिती मिळते. त्यामुळे आज राज्यसभेच्या या संपूर्ण कामकाजाकडे सर्वांचेच लक्ष आहे.

मोदी सरकारच्या या शेतकरी विधेयकांना देशभरातील शेतकऱ्यांकडून, अनेक राज्यांतून, राजकीय पक्षांतून तीव्र विरोध केला होत आहे. इतकेच नव्हे तर NDAचा सर्वांत जुना घटकपक्ष असलेल्या ‘अकाली दल’च्या नेत्या हरसिमरत कौर यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत विधेयकांविरोधात भूमिका घेत भाजपला धक्का दिला. त्यानंतर आता शिवसेनेनाही राज्यसभेत आपली भूमिका बदलण्याच्या तयारीत असल्याने भाजपसमोर मोठा पेच उभा राहण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात शनिवारी (१९ सप्टेंबर) याबाबत एक बैठक पार पडली होती. यावेळी शेतकरी विधेयकांविषयी राज्यसभेतील भूमिकेबद्दल चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामळे, यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये नेमकी काय चर्चा आणि निर्णय झाला ? तसेच आज राज्यसभेत काय घडणार ?याकडे सर्वांचेच लक्ष आहे. लोकसभेत सहजरित्या मंजूर झालेल्या या विधेयकाची राज्यसभेत मात्र कसोटी लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय लष्कर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करणार ?

News Desk

पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का- सिद्धूंचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा….

News Desk

सोशल मीडिया भाजपचे ऑक्सिजन, तर ही नळी मोदी फेकून देतील हे अशक्यच !

swarit