HW News Marathi
Covid-19

राज्य सरकारीची कार्यालय आणि कर्मचाऱ्यांसाठी नियमावली जाहीर

मुंबई | देशातील पाचव्या टप्प्याच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. देशातील पाचवा टप्प्यातील लॉकडाऊन हा कंटेन्मेंट झोन’ वगळता इतर ठिकाणचे दैनंदिन व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. नियमावली केंद्र सरकराने प्रसिद्ध केली आहे. केंद्रप्रमाणेच राज्याने आता अटीशर्थींसह राज्यातील शासकीय कार्यालय टप्प्या टप्प्याने सुरू होणार आहे. त्यासाठी आरोग्य खात्याने नियमावली दिलेली आहे. यानुसार राज्यातील कार्यालय आणि कर्मचाऱ्यांनी काय खबरदारी घ्यायची याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक कर्मचारी-अधिकारी आणि कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येकाचे थर्मल-इन्फ्रारेड थर्मामीटरने स्क्रिनिंग करणे बंधनकारक असणार आहे. हवा खेळती राहण्यासाठी दार-खिडक्या उघडी ठेवावी. सर्व कर्मचाऱ्यांनी तीन पदरी असलेल्या मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तोंडाला आणि नाकाला सतत हात लावणे टाळावे खोकला-सर्दी झालेली असेल तर टीश्यू पेपर, स्वच्छ धुतलेल्या रूमालाचा वापर करावा. कार्यालयात दोन कर्मचाऱ्यांमध्ये किमान तीन फुटाचे अंतर राखणे बंधनकारक आहे. कार्यालयात प्रवेश करणाऱ्या अभ्यागत अर्थात कामानिमित्त जाणाऱ्या व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक आहे कार्यालयाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर सॅनिटायझरची व्यवस्था, तसेच स्वच्छतागृहात साबण, हॅण्डवॉशची व्यवस्था करणे बंधनकारक, स्वच्छतागृहाचा वापर केल्यास हात साबणाने धुणे बंधनकारक, लिफ्ट, बेल, बटन, टेबल-खुर्ची आणि इतर उपकरणे दिवसातून तीन वेळा 2 टक्के सोडियम हायपोक्लोराईटने स्वच्छ पुसून घ्यावीत – कॉम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर दिवसातून दोन वेळा अल्कोहल मिश्रीत सॅनिटायझरने पुसून घ्यावे – कार्यालय साबण व पाण्याने धुवून घेणे या सर्व मार्गदर्शक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळांची संख्या १०३, तर प्रति दशलक्ष चाचण्यांच्या संख्येत दुप्पटीने वाढ

News Desk

अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय आता १० ऑगस्ट ला होणार !

News Desk

मंदिर बंद उघडे बार, उद्धवा अजब तुझे सरकार !, राज्य सरकारविरोधात भाजप आक्रमक  

News Desk