HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत गेल्या पाच वर्षांपासून महिला अपहरणात वाढ | मुख्यमंत्री

मुंबई | गेल्या पाच वर्षात मुंबईत मुली हरविणे आणि अपहरणाच्या प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत ही धक्कादायक आकडेवारी मांडली. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुंबईत २०१३ मध्ये १८ वर्षाखाली वयोगटातील हरवलेल्या किंवा अपहरण झालेल्या मुलींची संख्या ९२ होती. तर २०१४ मध्ये १५०० झाली तर २०१७ साली १३६८ होती. २०१३ ते २०१७ मध्ये या काळावधीत १८ वर्षाखालील वयोगटातील एकूण ५०५६ मुलींचे अपहरण आणि हरविलेल्या घटनांची आकडेवारी आहे. त्यापैकी ४७५८ मुली सापडल्या असून ३७० मुली बेपत्ता आहेत.

तसेच २०१३ ते २०१७ या कालावधीत १८ वर्षाखालील वयोगटातील मुला-मुलींचे अपहरण करून त्यांना भीक मागायला लावण्याबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल केला होता. परंतु त्यापैकी फक्त २ जणांवर गुन्ह्यात दोषी सिद्ध झाले आहेत. तर एक आरोपी दोषमुक्त करण्यात आले. या कालावधीत मुलींचा अनैतिक कृत्यासाठी वापर केल्याचे एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मी नीतिमत्ता गहाण ठेऊन राजकारण करणार नाही !

News Desk

अजितदादा जसा राजीनामा खिशात घेऊन फिरत होता तसा तो ६ हजार कोटींचा चेक घेऊन फिरत आहात त्याचं काय करणार?

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काँग्रेसला कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू! कॉंग्रेस नेत्याच्या निकटवर्तीयांचा आरोप

News Desk
देश / विदेश

थायलंडच्या ‘रेस्क्यू ऑपरेशन’मध्ये मराठमोळ्या किर्लोस्करांचे अमुल्य योगदान

News Desk

बँकॉक | थायलंडमधील गुहेमध्ये २४ जूनपासून आडकलेल्या १२ फुटबॉल खेळाडूसह त्यांच्या प्रशिक्षकाला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. या मुलांना वाचविण्यासाठी महाराष्ट्राने अमुल्य योगदान दिले होते. ही मुले टॅम लूंग या गुहेत अडकली होती. मुलांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्रातील किर्लोस्कर कंपनीचे ‘फ्लड पंप्स’ पाठवण्यात आले होते. मुलांना वाचविण्यासाठी थायलंड सरकाराने भारतासह अमेरिका, इस्रायल जगभरातील अनेक देशांची देखील मदत घेण्यात आली होती.

या मुलांना बाहेर काढण्यासाठी गुहेतील पाण्याची पातळी कमी करणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे थायलंड सरकारने भारत सरकारला विनंती करून किर्लोस्कर ब्रदर्स (केबीएल) फ्लड पंप्स पाठवण्यास सांगितले. या रेस्क्यू ऑपरेशनसाठी किर्लोस्कर यांचे डिझाईन इंजिनिअर असलेले सांगलीतील मिरजचे प्रसाद कुलकर्णी यांची टीम शुक्रवारी रात्री तातडीने रवाना केली. थायलंडला पोहोचताना या टीमने कामास सुरुवात केली आणि फ्लड पंप्स सुरू केले. या पंप्साचा वापर करून पाण्याचा उपसा केल्यामुळे गुहेतील बचाव कार्याला गती आली. यामुळे १२ फुटबॉल खेळाडूसह त्यांच्या प्रशिक्षकाला बाहेर काढण्यात यश आले.

मुले गुहेत कशी अडकली

थायलंडमधील एका शाळेतील १२ मुले फुटबॉल खेळल्यानंतर आपल्या प्रशिक्षकाबरोबर २३ जूनला ‘टॅम लूंग’ ही गुहा पाहण्यासाठी गेले होते. परंतु गुहेत पुराचे पाणी आल्याने ही सर्व मुले तिथेच अडकून पडली. त्यानंतर नॅशनल पार्कच्या कर्मचाऱ्यांना गुहे बाहेर सायकल आणि खेळाचे काही साहित्य दिसले. याबाबत कर्मचाऱ्यांनी स्थानिक फुटबॉल क्लबशी संपर्क साधल्यानंतर १२ लहामुले आणि त्यांचा प्रशिक्षक गुहेत अडकले असल्याचे समोर आले.

Related posts

गोल्फर ज्योति रंधावाला अटक

News Desk

‘अमित शाह संसदेत आले, तर मी टक्कल करेन’, देरेक ओब्रायनचं अमित शहांना आवाहन

News Desk

“एक आदिवासी मुख्यमंत्री असल्यामुळे त्रास देत आहेत”, हेमंत सोरेन यांचा आरोप

Aprna