HW News Marathi
महाराष्ट्र

विधानभवनाची बत्ती गुल, नागपुरात मुसळधार पाऊस

नागपूर | नागपूरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात आहे. यामुळे विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशना पहिल्यांदाच बत्ती गुल झाल्यामुळे विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित झाले आहे. विधीमंडळाचे पुढील कामकाज सोमवारी होणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात याआधी कधीच विधीभवनाची बत्ती गुल झाली नव्हती. पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. विरोधक विधीभवनाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांना दीडपट हमीभावाचा हा फक्त जुमला असल्याचे घोषणा करत होते. विरोधकांनी मोबाईलच्या फ्लॅश लाईटचा आधार घेत सरकार विरोधात घोषणा करत होते.

या पावसामुळे नागपूरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहे. या मुसळधार पावसामुळे विधानभवनातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. विधिमंडळाला वीज पुरविण्यासाठी उभारण्यात आलेल्या लाईट रुममध्ये पाणी शिरल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला नसून तो तात्पुरता बंद करण्यात आला असल्याची माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

नागपूर अधिवेशनात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे कामकाज थांबविण्यात आले आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर जलयुक्त नागपूर करुन दाखविले, अशा शब्दात टीका करुन सरकारवर निशाणा साधला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक हा पद्म पुरस्कारांचा निकष आहे का? – सचिन सावंत

News Desk

खडसे आमचे पालक आहेत, त्यांनी आमच्या २ थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही – चंद्रकांत पाटील

News Desk

“उगाच काड्या करण्याचं काम कोणीही करू नये!” राऊतांचा धमकीवजा इशारा

News Desk