HW News Marathi
महाराष्ट्र

महिलांना स्व-संरक्षणाचे धडे

मुंबई | सध्याचा काळ हा महिलांच्या दृष्टीने अत्यंत कठीण काळ आहे. महिलांची सुरक्षितता धोक्यात आहे. महिलांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देत भैरी भवानी एंटरप्राइजतर्फे नुकतेच महिला कर्मचाऱ्यांना स्व-संरक्षणाचे धडे देण्यात आले. जय हिंद अकॅडेमीचे निवृत्त जवान रक्तकर्ण महेश नरवडे यांच्यामार्फत हे धडे देण्यात आले. यावेळी भैरी भवानी एंटरप्राइजचे अध्यक्ष गंगाराम सनगले तसेच कंपनीचे सीईओ श्रेयस सनगले आदी मान्यवर उपस्थित होते.

भैरीभवानी एंटरप्राईज ही दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था आहे. निव्वळ व्यवसाय न करता विविध सामाजिक उपक्रम राबविणारी उद्योजकीय संस्था म्हणून देखील भैरीभवानीचे एक वेगळे अस्तित्व आहे. याच सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून भैरीभवानीने आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी स्व-संरक्षणाचे धडे दिले. हे प्रशिक्षण जय हिंद अकॅडेमीचे निवृत्त जवान रक्तकर्ण महेश नरवडे यांनी दिले. तसेच प्रथोपचार आणि सीपीआरचे प्रशिक्षण देखील यावेळी इतर कर्मचाऱ्यांना देण्यात आले. महेश नरवडे हे सैन्यातील निवृत्त जवान असून त्यांना सैन्याचा 16 वर्षे आणि काश्मीर मधील राष्ट्रीय रायफल या तुकडीचा 3 वर्षांचा अनुभव आहे ते सैन्यातील क्विक रिऍक्शन टीमचे नेतृत्व करत.

स्त्रियांनी स्वत:जवळील वस्तू जसे कात्री, सेफ्टी पिन, हेअर क्लिप, डिओ स्प्रे, एटीएम कार्ड यांचा स्वसंरक्षणासाठी कसा वापर करावा. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने सोसायटी मधील सुरक्षा कशी वाढवावी. ११२ इंडिया सारखे सेफ्टी ऍपची माहिती देखील महेश नरवणे यांनी यावेळी दिली.

“महिला सक्षमीकरणास आमची संस्था नेहमीच प्राधान्य देते. त्यादृष्टीने काही उपक्रम देखील राबवितो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणजे महिला कर्मचाऱ्यांना दिलेले स्व-संरक्षणाचे धडे. स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी भविष्यात देखील भैरी भवानी एंटरप्राईज विविध उपक्रम राबवित राहील”, असे भैरी भवानी एंटरप्राइजचे अध्यक्ष गंगाराम सनगले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

….त्याच दिवशी संजय राठोडने पूजाला ४५ फोन केले होते !, चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

News Desk

कर्जत-जामखेडमधून रोहित पवारांची उमेदवारी धोक्यात येणार ?

News Desk

मराठा समाजाचा OBC मध्ये समावेश केल्यास कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत – विनोद पाटील

News Desk
व्हिडीओ

ठाकरेंचा योगींना टोला, म्हणाले मराठवाड्यात सभा लावा नामांतर होईल

News Desk

सामना संपादकीयमधून आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर शहरांच्या नामांतराच्या मुद्यावरुन टीकास्त्र सोडण्यत आले आहे. ”प्रश्न हैदराबादचे भाग्यनगर कधी होणार हा नसून अयोध्येत राममंदिर कधी होणार हा आहे. रामाचा वनवास कधी संपणार ते सांगा. रामाचे भाग्य कधी फळेल ते जाहीर करा. योगी हे मुख्यमंत्री म्हणून प्रचारात तोफा डागत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने दुकान बंद करून प्रचाराची फळी सांभाळली आहे. जातील तेथे घोषणा व नामांतर असेच सुरू आहे. योगी यांची एक सभा मराठवाडय़ात लावा, म्हणजे औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशीव सहज होईल”, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी योगींना लागवला आहे

Related posts

“आम्ही मरावं की जगावं?” अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा Thackeray सरकारला उद्विग्न सवाल

News Desk

BMC निवडणुका होणारच नाहीत; Prakash Ambedkar यांचं धक्कादायक विधान

News Desk

“मविआचे आमदार माकडचाळे करतात, त्यांच्यावर कारवाई करा” – Pratap Sarnaik

Seema Adhe