HW News Marathi
महाराष्ट्र

बांधकामावर राबणाऱ्या जीवांचे काहीच मोल नाही का?

पुणे | पुण्यातील कोंढवा परिसरात भिंत कोसळून मोठी दुर्घटना घटना घडली आहे. यात १५ जणांचा मृत्यू झाला असून या घटनेला जबाबदार कोण यावरुन आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अजून काही जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली आहे. यामुळे मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत या दुर्घटनेवरून बांधकामावर राबणाऱ्या जीवांचे काहीच मोल नाही का?, असा सवाल उपस्थिती करून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले. पुढे म्हटले की ” कोंढवा दुर्घटनेने बांधकाम मजूरांच्या सुरक्षेचा मुद्दा किती गंभीर आहे हे समोर आले. बांधकामावर राबणाऱ्या जिवांचे काहीच मोल नाही का? असा संतप्त सवाल मुख्यमंत्र्यांना करत हे कामगार असंघटित क्षेत्रातील आहेत म्हणून त्यांच्या सुरक्षेकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. पुणे महानगरपलिकेने देखील ही घटना गांभिर्याने घ्यावी, असा सल्ला सुळे यांनी ट्विट करत दिला आहे.

नगरविकास खात्यानेही बांधकाम व्यावसायिक कामगार पुरविणारे ठेकेदार यांच्यावर असणारी कामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षितता पुरविण्याची जबाबदारी निश्चित करावी. त्याची कठोर अंमलबजावणी होतेय की नाही हे सरकारने पहावे.अशी मागणी सुळे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवणार! – अनिल परब

Aprna

राफेलचे ताफ्यात सामील होणे गेमचेंजर ठरणार नाही – शरद पवार

News Desk

महाराष्ट्राच्या खारफुटी जंगल संवर्धन आणि संरक्षणाची केंद्राकडून दखल

News Desk