HW News Marathi
महाराष्ट्र

सगळे खापर केंद्र सरकारवर फोडायचे आणि स्वतः मात्र काही करायचे नाही!, भारती पवारांचे महाविकासआघाडीवर टीकास्त्र

बीड | सगळे खापर केंद्र सरकारवर फोडायचे आणि स्वतः मात्र काही करायचे नाही. अशी भूमिका महाराष्ट्रात राज्य सरकारची आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी केली आहे. भारती पवार पुढे म्हणाले, केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वात जास्त लस दिले. आर्थिक बजेट देखील दिले. त्याच श्रेय मात्र घेतले जाते. परंतु सांगत असताना लोकांमध्ये भ्रम निर्माण केले जात आहे, हे दुर्दैव आहे, असा टोलाही भारती पवार यांनी महाविकासआघाडी सरकारला लगावला आहे. त्या बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता बोलत होत्या.

पुढे बोलताना भारती पवार म्हणाल्या की, “भाजपच्या लोकांवर राज्य सरकार सूडबुद्धीने काम करत आहे. नारायण राणे असतील आणि इतर लोकांना त्रास देणे सुरू आहे. निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात. आम्ही कुठल्याही यशाने हुरळून जात नाहीत आणि अपयशाने खचून जात नाहीत, अशी आमची भारतीय जनता पार्टी आहे. देशसेवेसाठी जे जे करता येईल ते केंद्र सरकार काम करत आहे. राज्य सरकारने काय काय केले. हे आपण पाहतच आहात. शेतकरी प्रश्नावर राज्य सरकारने विशेष लक्ष दिले पाहिजे.” 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

थातूरमातूर बोलून विषय टोलवू नका, राम कदमांचे राऊतांना आव्हान 

News Desk

आता घोटाळा अशोक चव्हाणांचा का?, ५४ कोटी कुठल्या मंत्र्यांचे? सोमय्यांचा ठाकरे सरकारला सवाल

News Desk

दिशा सालियान प्रकरणावरुन निलेश राणेंचा सरकारला सवाल

News Desk