HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाची संख्या कमी होत असताना अशी मागणी करणं हे षडयंत्र तर नाही ना?

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचे आपण खंदे पुरस्कर्ते आहात. मात्र आता ‘धर्मनिरपेक्षता’अंगीकारली आहे काय? असा सवाल मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून विचारला होता. त्यावर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र ही दुर्दैवी आणि असंवैधानिक घटना असल्याची टीका महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

राज्यपाल हे संविधानिक पद आहे. त्या पदावरील व्यक्तीने धार्मिक भूमिका घेणं अयोग्य आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र ही दुर्दैवी आणि असंवैधानिक आहे, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. तसंच राज्यात कोरोनाची संख्या कमी होत असताना अशी मागणी करणं हे षडयंत्र तर नाही ना?, अशी शंकाही यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केली.

दिल्लीत ८ जूनला, तर देशाच्या इतर भागात जून महिन्याच्या अखेरीस प्रार्थनास्थळे उघडली होती. पण त्यानंतर कोव्हिड रुग्णांमध्ये वाढ झाल्याची उदाहरणे पाहायला मिळाली नाहीत, असा दावा राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला. त्यावर राज्यपालांनी जर कोरोना पसरणार नाही याची जबाबदारी घेतली तर मंदिरे खुली करायला हरकत नाही, असे त्या म्हणाल्या आहेत. “राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल पत्र ही दुर्दैवी आणि असंवैधानिक घटना आहे.राज्यपाल हे संविधानिक पद आहे. त्या पदावरील व्यक्तीने धार्मिक भूमिका घेणं अयोग्य आहे. तसंच राज्यात कोरोनाची संख्या कमी होत असताना अशी मागणी करणं हे षडयंत्र तर नाही ना?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने परळीत मुंडे बहीण-भावात मोर्चे बंधणीला सुरुवात

Aprna

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले खासदार संभाजीराजे यांचे आमरण उपोषण मागे

Aprna

एमएचटी सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी परीक्षेला सुरुवात, उदय सामंतांची घोषणा!

News Desk