HW News Marathi
महाराष्ट्र

“होय मी CDR मिळवला करा माझी चौकशी”, फडणवीस सभागृहात कडाडले

मुंबई | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणात केलेल्या आरोपांमुळे सत्ताधारी महाविकासआघाडीची कोंडी झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज (९ मार्च) सभागृहात हिरेन मनसुख यांची पत्नी विमला मनसुख यांच्या तक्रारीची प्रत आणि कॉल डिटेल्स रेकॉर्डच्या आधारे या प्रकरणातील तपास अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले.

मोहन डेलकर पाचवेळा दादरा नगर हवेलीचे खासदार राहिले. त्यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केल्या. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांचं नाव आहे. मी मुंबईत आत्महत्या करत आहे. कारण मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असं डेलकर यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी सभागृहाला दिली.

उपलब्ध पुरावे हे सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुरेसे आहेत. त्यामुळे सचिन वाझे यांना बडतर्फ करून त्यांचा तात्काळ अटक करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांच्या या मागणीनंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडले. तेव्हा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला. मुळात देवेंद्र फडणवीस यांना कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) कसे मिळाले, त्यांना ते मिळवण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला होता.

नाना पटोले यांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस ताडकन उभे राहिले आणि सरकारने माझी चौकशी करावीच, असे खुले आव्हान दिले. मी सीडीआर मिळवला, माझी चौकशी करा. पण खून केला त्याला पाठिशी का घालता? तुम्ही मला चौकशी लावण्याची धमकी देत आहात का? सभागृहात बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे. तुम्ही माझी चौकशी लावा. मात्र, याप्रकरणात तुम्ही शोधणार नाही, त्यापलीकडची माहिती मी मिळवून दाखवतो, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला ललकारले.

चोख सुरक्षा व्यवस्था असताना अंबानींच्या घराबाहेर पोहोचतेच कशी, या प्रकरणातले सीडीआर बाहेर कसे येतात, असे सवाल पटोलेंनी उपस्थित केले. याची चौकशी व्हायला हवी, असं पटोले म्हणाले. त्यावर, “मी मिळवले सीडीआर. माझी चौकशी करा. चौकशीच्या धमक्या कुणाला देता? असं म्हणत फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. माझी चौकशी करा. पण त्याआधी खुन्याला अटक करा”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडलं.

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याशी संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं त्यावर भाष्य करणं योग्य नाही, असं देशमुख म्हणाले. त्यावर हे प्रकरण न्यायालयात गेलं असलं तरीही ते सुनावणीसाठी आलेलं नाही, असं प्रत्युत्तर देत फडणवीस यांनी देशमुखांचा मुद्दा खोडून काढला. यावर केंद्र, राज्याची सुरक्षा यंत्रणा असताना मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं असलेली कार पोहोचलीच कशी, असा प्रश्न काँग्रेस नेते नाना पटोलेंनी उपस्थित केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानभवनाच्या आवारात चुकीची वागणूक करणाऱ्या विरोधी सदस्यांवर कारवाई व्हावी !

News Desk

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आग्ऱ्याच्या लाल किल्ल्यात साजरी होणे हा सुवर्ण क्षण! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

बबनराव लोणीकरांना मानसिक उपचारांची गरज : खा.अशोक चव्हाण

News Desk