HW News Marathi
महाराष्ट्र

जम्मू काश्मीरमध्ये तणाव, दहशतवादी हल्ल्यात पोलिसाचा मृत्यू, 11 जवान जखमी

नवी दिल्ली। जमू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी रविवारी सायंकाळच्या सुमारास जवानांवर हल्ला करून दहशत पसरवण्याचा भ्याड प्रयत्न केला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक पोलिस ठार तर 11 जवान जखमी झाले आहेत. यात सीआरपीएफचे चार जवान तर पोलिसांचे सात जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, काही ठिकाणी दगडफेक देखील करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नशरी चेनानी या बोगद्याचे उद्घाटन केल्यानंतर हा हल्ला झाला. पंतप्रधान मोदी येणार आहेत म्हणून श्रीनगर बंद ठेवावे, असे आवाहन फुटीरतावाद्यांनी केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मार्चमधील अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीचे १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Aprna

राज्यातील साखर कारखाने केंद्रामुळेच वाचले,चंद्रकांत पाटलांचे प्रतिपादन!  

News Desk

शासन आणि बांधकाम व्यावसायिकांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास गृहनिर्माण क्षेत्राला उर्जितावस्था मिळेल!– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna
मुंबई

  विश्वजीत कदम, उद्योजक अविनाथ भोसलेंच्या घरावर आयकर विभागाचा छापा

News Desk

वृत्तसंस्थाः काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि उद्योजक अविनाश भोसलेंच्या या दोघांच्याही निवासस्थान आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापा घातला आहे. माजी वनमंत्री पतंगराव कदम यांचे सुपुत्र असलेले विश्वजीत कदम हे उद्योजक अविनाश भोसले यांचे जावई आहेत. छापेमारी कोणत्या कारणाने झाली आहे, याबाबत अस्पष्टता आहे. अधिकारी सध्या तपासणी करत आहेत. सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांचीही मदत घेण्यात आली आहे.

अविनाश भोसले यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन काढून घेतले आहेत. अशीच तपासणी विश्वजीत कदम यांच्या कार्यालयातही सुरु आहे. अविनाश भोसले आणि विश्वजीत कदम यांच्या कोण-कोणत्या कार्यालयांवर छापेमारी झाली आहे, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. छापेमारी कोणत्या कारणाने झाली आहे, याबाबतही अस्पष्टता आहे.

Related posts

ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने ‘रोजगारमुक्त’ केले, त्यांनी ‘मोदीमुक्त भारता’ची मुक्ताफळे उधळली

News Desk

अतिवृष्टीमुळे परीक्षेला पोहोचू न शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार

News Desk

शेतकरी पशुपालकांसाठी लम्पी रोगाविषयी संपर्क साधण्याकरिता मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना

Aprna