HW News Marathi
महाराष्ट्र

प्रेमीयुगुलापुढे पोलीस हतबल

जळगावः एका अल्पवयीन युवतीने तिच्या प्रियकराला पळवून आणून लग्न लावल्याचा प्रकार रोहनवाडी येथे उघडकीस आला. पोलिसांनी हा विवाह रोखण्याचा प्रयत्न केला परंतु युवतीने पोलिसांना पोलिस ठाण्यातच खडसवाल्याने पोलीसह आवाक झाले.

कारंजा लाड येथील तरुण-तरुणींचे एकमेकांवर सन २०१३ पासून प्रेम आहे. दोघेही शेजारी राहतात. तरुणाचे कपड्यांचे दुकान आहे. तो वडील सावत्र आईसोबत राहतो. त्याची आई जळगावला रोहनवाडीत राहते. दोघांच्या लग्नाला युवतीच्या घरच्यांनी नकार दिला. त्यामुळे २६ जून रोजी रात्री दोघांनी कारंजा लाड येथून पलायन केले. तरुणाची आई जळगावातील रोहनवाडी येथे राहते. दोघेही तेथे आले. तेव्हापासून ते रोहनवाडीत आहेत. तरुणी हरवल्याबाबत तिच्या पालकांनी कारंजा लाड येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. शुक्रवारी रोहनवाडीत अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याचे कुणी तरी तालुका पोलिसांना कळवले. त्यावरून पोलिसांनी रोहनवाडी येथून या प्रेमीयुगुलास ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.

पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी सविस्तर हकीकत सांगितली. युवती बिनधास्तपणे पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देत होती. पोलिस उपनिरीक्षक सारिका कोडापे यांनी त्यांची चौकशी केली. दरम्यान, तालुका पोलिसांनी कारंजा लाड पोलिसांशी संपर्क साधला असून प्रेमीयुगुलास त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विधीमंडळाचे १५ दिवसांचे अधिवेशन घ्या

News Desk

“गृहपाठ न केल्यामुळेच तोंडघशी पडावे लागले!”, शेट्टींची पडळकर-खोतांवर टीका

News Desk

जेईई, नीट तसेच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले धनंजय मुंडे

News Desk
क्राइम

मुंबईच्या प्रवाशाला महामार्गावर मारहाण करत लुटले

News Desk

पुणे-मुंबई महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुणेः पुणे-मुंबईः द्रुतगती महामार्गावर मुंबईतील एका प्रवाशाला बेदम मारहाण करून त्याच्याकडील ऐवज लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्रीच्या सुमारास उघडा. पंकज सुनील कदम (वय २७, रा. मालाड, मुंबई) असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. गाडीतील व्यक्तींनी पंकज यांना धारदार शस्त्रे, लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या चोरट्यांनी पंकज यांच्याकडून रोख १५०० रूपये आणि मोबाइल चोरून नेला.

वाकड- हिंजवडी पुलाखाली खासगी वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीत पंकज कदम हे मुंबईकडे जाण्यासाठी बसले होते. मात्र, या गाडीतील चालकासह चार व्यक्तिंनी पंकज यांना धारदार शस्त्राने, लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यांच्याकडील रोख रक्कम १५०० रुपये आणि मोबाइल काढून घेतला. त्यानंतर त्यांना पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील किवळे येथे सोडून दिले. जखमी अवस्थेत काही नागरिकांनी पंकज याना खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर खासगी वाहतूक करणारी काळ्या रंगाची ही स्कॉर्पिओ मुंबईकडे गेली. सध्या देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल असून तो हिंजवडी पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.

दरम्यान, या घटनेमुळे पुणे- मुंबई महामार्गावर खासगी वाहनातून प्रवास करणा-या हजारो प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. नफा कमावण्याच्या स्पर्धा आणि त्यात येणारे अपयश यातून खासगी वाहनांतील काही भामट्यांनी हा प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

Related posts

नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमधील थरार

News Desk

“… व्हायरल होतात ते मी कसे थांबवू”, उर्फी जावेदचा पोलिसांनाच उलट सवाल

Aprna

नयना पुजारी बलात्कार-हत्या प्रकरणी तिघेजण दोषी

News Desk