HW News Marathi
महाराष्ट्र

“गृहपाठ न केल्यामुळेच तोंडघशी पडावे लागले!”, शेट्टींची पडळकर-खोतांवर टीका

मुंबई | “काही उथळ लोक यात घुसले होते. ही गोष्ट खरी आहे. शेवटी शेतकरी चळवळ आणि कामगारांची चळवळ वेगळी असते. याचा गृहपाठ न केल्यामुळे त्यांना तोंडघशी पडावे लागले,” असे मत व्यक्त करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर सडकून टीका केली आहे.

“ज्यांचे आपण नेतृत्त्व करतो त्यांच्या आपेक्षा आपण भरपूर वाढून ठेवल्या आणि त्या अपेक्षा पुर्न झाल्या नाहीत. मग शेवटी चळवळ म्हणजे एक प्रकारचा वाघच आहे. वाघावर स्वार पाय होणे सोपे असते. पण, एकदा स्वार होऊन परत पायउतार होणे अवघड असते. अन्यथा वाघ खवळला, तर मग वाघाने ज्याला आपल्यावर स्वार केलेले असते. त्याला खाऊ टाकायला पण तो कमी पडत नाही,” असे उदाहरण देऊन पडळकर आणि खोतांवर निशाणा साधला.

एसटी कर्मचाऱ्यांना सरकारच्या वतीने ४१ टक्क्याने वाढण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे मुंबईतील आझाद मैदानातील तात्पुरते आंदोलन मागे घेतल्याचे खोतो आणि पडळकरांनी आज (२५ नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना सांगितले. राज्य सरकारकडून संपावर तोडगा म्हणून एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व लिपिकांच्या पगारात सुमारे ७२०० रुपयांपासून ३६०० रूपयांपर्यत घसघशीत वाढ केली आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज काल घोषणा केली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमरावतीत शेतक-याची आत्महत्या

News Desk

महाराष्ट्राला उद्योगात ‘क्रमांक एक’चे राज्य करणारच! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

“पुण्याच्या महापौरांना झेपत नसेल तर राजीनामा द्या”, सुप्रिया सुळे भडकल्या

News Desk