HW News Marathi
मनोरंजन

ट्विटरचे गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने स्पेशल इमोजी

नवी दिल्ली | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची २ ऑक्टोबरला १५० व्या जयंतीनिमित्ताने ट्विटर स्पेशल इमोजी लाँच केले आहे. ट्विटरवर आजपासून ट्विटरवर महात्मा गांधींचे इमोजीचा वापरण्यास सुरुवात झाली आहे. गांधी जयंती हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून देखील साजरा केला जातो. ट्विटरवरील गांधींचे हे इमोजी निळ्या आणि पांढऱ्या रंगाचे आहे.

विविध सणांसाठी ट्विटरचे इमोजी

दिवाळी, गणेश चतुर्थी, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, आंतरराष्ट्रीय योग दिन आणि बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने ट्विटरने इमोजी लाँच केले होते. ट्विटरने हे नेहमी आपल्या फॉलोअर्ससाठी इमोजीक लाँज केले होते.

ट्विटरवरील हॅशटॅग

महात्मा गांधी जयंती शुभेच्छा देऊन त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या कतृत्त्वाला उजाळा देण्यासाठी ट्विटवर हॅशटॅग देऊन शकतो. #GandhiJayanti, #MahatmaGandhi, #MKGandhi, #BapuAt150, #MyGandhigiri, #NexusOfGood, #MahatmaAt150, #गाँधीजयंती, #ગાંધીજયંતિ हे हॅशटॅग वापरल्यानंतर ट्विटर वापरकर्त्यांना विशेष इमोजी दिसतील. हा इमोजी पुढील आठवडाभर वापरता येईल, अशी माहिती ट्विटर इंडियाने दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जाणून घ्या… बालदिन १४ नोव्हेंबरलाच का साजरा केला जातो

News Desk

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटासंदर्भात बॉलिवूडमध्ये दोन गट; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Aprna

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठी विभागात ‘गोष्ट एका पैठणीची’ ठरला उत्कृष्ट सिनेमा

Aprna
राजकारण

राष्ट्रवादीचे सरकारविरोधात २ ऑक्टोबरला राज्यभर मौनव्रत धारण करत आंदोलन…

News Desk

मुंबई | केंद्र व राज्यसरकारच्या फसव्या धोरणांमुळे आर्थिक,सामाजिक परिस्थिती खालावली असून सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या आणि लोकशाही मुल्यांची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस २ ऑक्टोबरला राज्यभर धरणे आणि मौनव्रत आंदोलन करत आहे.

भाजपच्या प्रतिगामी धोरणांमुळे महात्मा गांधींनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य, लोकशाही व संविधानिक सार्वभौमत्व धोक्यात आलेले आहे. त्यामुळे सरकारच्याविरोधात राष्ट्रवादीने आंदोलनाचे हत्यार उपसले असून २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जंयत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर महात्मा गांधीजींच्या पुतळयाखाली बसून धरणे व मौनव्रत आंदोलन केले जाणार आहे.

राज्यासह मुंबईमध्ये मंत्रालयाजवळ महात्मा गांधीजींच्या पुतळयासमोर प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आदी नेत्यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत महात्मा गांधींजींच्या पुतळयासमोर धरणे व मौनव्रत धारण करणार आहेत.

Related posts

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

News Desk

“राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल,” फडणवीसांचा पुन्हा एकदा दावा

Aprna

दुसरीकडे जाणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, थोरातांचा विखे-पाटील यांना टोमणा

News Desk