HW News Marathi
मुंबई

आम्ही काय सतरंज्या उचलायच्या का; कार्यकर्त्याचा अजित पवारांना सवाल

ज्या माणसाने राष्ट्रवादीसाठी आपले आयुष्य घडवायचे ते १० वर्ष खर्च केले, तसेच ज्यांनी घराघरात घड्याळ पोहचविले अशा निष्ठावंत कार्यकर्त्याचे तिकीट कापण्यात येते, त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची हीच का किमत? असा परखड सवाल कर्वेनगर परिसरातील प्रभाग क्रमांक ३१ मधील केदार मारणे यांनी अजित पवारांना विचाराला आहे.

केदार मारणे यांच्याकडून कर्वेनगर प्रभाग क्रमांक ३१ मधून आपल्या मातोश्रीसाठी उमेदवारी मागण्यात आली होती. परंतु त्यांना तिकीट नाकारण्यात आली असून ‘काल आले आणि उमेदवार झाले, अशी परिस्थिती झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे केदार मारणे यांनी पक्षाबद्दल असंतोष व्यक्त केला असून अजित पवारांना याविषयीचे पत्र लिहिले आहे.

या पत्रामध्ये केदार वसंत मारणे यांनी असे लिहिले आहे कि, गेली १० वर्ष मी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता असून मी उमेदवारी मागितली म्हणून काय चूक केली? गरीब कार्यकर्त्यांनी तिकीट मागायचे नाही का? ज्यांनी घराघरात घड्याळ पोहचविले अशा निष्ठावंत कार्यकर्त्यानांच आपण तिकीट कापता. ज्या माणसाने राष्ट्रवादीसाठी आपले आयुष्य घडवायचे ते १० वर्ष खर्च केले. अशा लोकांवरच आपण अन्याय केला, काल आले आणि उमेदवार झाले. निष्ठावंत कार्यकर्त्यांची हीच का किमत?

आज त्यांच्या पक्षाला प्रतिकूल परिस्थिती राहिली नाही म्हणून ते आपल्या पक्षात आलेत ते आपल्याकडे कायम राहतील का? आणि आज आपण त्यांना पक्षात घेतले ज्यांच्या विरोधात आम्ही काम केले. आज त्यांच्या पालख्या निष्ठावंतांनी उचलायच्या का? हि खरच आमच्या स्वाभिमानी साहेब, दादांची राष्ट्रवादी राहिली का? जुने राष्ट्रवादी निष्ठावंत दादाभक्त संपविण्याचा कार्यक्रम चालू आहे का? असा जळजळीत सवाल मारणे यांनी केला आहे.

आजपर्यंत पक्ष प्रवेश केल्यापासून साहेब, दादा, ताई यांच्या वाढदिवसांचे आणि विविध कार्यक्रमांचे फ्लेक्स लावणे, कार्यक्रम घेणे इत्यादी कामे सतत केली, हे करण्यासाठी आर्थिक खर्च होतो. एक वृत्तपत्र टाकण्याचा व्यवसाय करून हे खर्च केले. कार्यकर्त्याला पगार नसतो हे तुम्हाला माहिती आहे. तरीही पक्षासाठी आम्ही हे करतो, आम्ही कर्जबाजारी होतो आणि कर्ज बाजरी होऊन पक्ष जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो, आणि शेवटी दरवर्षीप्रमाणे उमेदवारी आयात उमेदवारांना दिली जाते, हा कोणता न्याय? अन्याय झाला तरीही मी बंडखोरी केली नाही. आम्ही आयुष्यभर सतरंज्या उचलायच्या का? आम्ही फक्त फ्लेक्स लावयाचे का? भविष्यात कधी मला संधी मिळणार कि नाही? कि फक्त निष्ठावंताची कामे करायची का? असेही मारणे यांनी म्हटले आहे.

तसेच आतापर्यंत आपण पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली तेव्हा पक्ष २ नंबरला होता. परंतु त्यानंतर आपण आयात उमेदवाराला उमेदवारी देणे चालू केले. त्यानंतर पक्षाचे डिपॉझिट जप्त झाले. त्यामुळे निष्ठावंताना संधी द्यावी अशी मागणी केली. तसेच मी अजित पवारांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे सदैव राष्ट्रावादिसाठीच कार्यरत राहीन, आयात उमेदवारांचे काम करणार नाही. त्यामुळे प्रभाग १०, ३२, १३ या प्रभागांपैकी एका प्रभागात काम करण्याची परवानगी मारणे यांनी मागितली असून, बंडाळी न करता पक्षाचेच काम करत राहणार असल्याचे म्हटले आहे. एकूणच मतदार कोणाला कल देतील ते काळच ठरवणार असला तरी, पक्षाने निष्ठावंतांना न्याय दिला पाहिजे असे मत सर्वच स्तरातून व्यक्त होताना दिसते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पिल्लाचा मृत्यू

swarit

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस

News Desk

मुंबईत आजचा पारा 13.8 अंशावर पोहोचला

Aprna