HW News Marathi
मुंबई

…तर त्या वाहनांची नोंदणी होणार नाही

पुणे – ‘बीएस-3’ वाहनांची 31 मार्च रोजी विक्री झाली असेल आणि त्या व्यवहाराची रात्री बारा वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंद केलेली नसेल किंवा शहराबाहेरील व्यक्तीस वाहन विकले असेल आणि तात्पुरता परवाना घेतला नसेल, तर या वाहनांची एक एप्रिलपासून नोंदणी होणार नाही. ती वाहने अनधिकृत समजली जातील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या आदेशानुसार “बीएस-3′ वाहनांची आज, शनिवारपासून आरटीओकडे नोंदणी केली जाणार नाही. त्यामुळे उत्पादक आणि वितरकांकडे उपलब्ध असलेल्या सर्व वाहनांची एका दिवसात विक्री करण्यासाठी मोठी सूट देण्यात आली. शहरात गेल्या दोन दिवसांपासून वाहनखरेदी करण्यासाठी वितरकांच्या शो-रूमबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी आरटीओचे कामकाज रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू होते, तर शुक्रवारीदेखील हीच स्थिती होती.

या वाहनांच्या नोंदणीचा शेवटचा दिवस म्हणून परिवहन आयुक्तांनी शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत वाहन नोंदणीचे कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आरटीओची संपूर्ण यंत्रणा सकाळपासून याच कामात व्यस्त होती. वितरकांकडून ऑनलाइन नोंद केली जात होती, त्यास आरटीओकडून मंजुरी दिली जात होती. मात्र, यानंतरही वाहनांची नोंदणी झाली नाही, तर त्या वाहनांची नोंदणी दुसऱ्या दिवसापासून केली जाणार नाही, असे आजरी यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पादचारी पूल हटविताना क्रेन उलटली

News Desk

मुख्यमंत्री भेटीसाठी उद्धव ठाकरे अडीच तास ताटकळले

swarit

बेस्ट प्रवास महागला

News Desk
देश / विदेश

उत्तर प्रदेशातील भीषण रेल्वे अपघातात 23 ठार

News Desk

मुजफ्फरनगर :उत्तरेत झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने देशभरात थरकाप उडाला आहे. पुरी-हरिद्वार उत्कल एक्सप्रेस चे 14 डब्बे रुळावरून घसरून शनिवारी सायंकाळी हा भीषण अपघात झाला. यात 40 जण जखमी झाले आहेत. मुजफ्फर नगर जिल्ह्यात खतौली येथे झालेल्या या अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत.

सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना तत्काळ मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या. सुरेश प्रभू यांनी टिष्ट्वट करून, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती दिली. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सदस्य यांना मदत आणि बचावकार्याची देखरेख करण्यास सांगितले आहे. एनडीआरएफच्या तुकड्या गाझियाबादमधून मदतीसाठी रवाना झाल्या आहेत. मेडिकल व्हॅनही येथे पोहोचल्या आहेत.

अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Related posts

देशाला लोकशाही काँग्रेसने किंवा नेहरुंनी दिलेली नाही – नरेंद्र मोदी

News Desk

अमेरिकेने रोखली पाकिस्तानची रसद

News Desk

महाराष्ट्र एनसीसी चमूचे यश गौरवास्पद! – उद्धव ठाकरे

Aprna