HW News Marathi
मुंबई

दिवा रेल्वे स्थानकात प्रवाश्यांचं आंदोलन

मुंबई मध्यरेल्वेच्या दिवा स्थानकात रोहा दिवा पँसेंजर उशिरा आल्याने प्रवाश्यानी रेल्वे रूळावर येऊन आंदोन केलं आहे.

रोहा दिवा पँसेंजर उशिरा आल्याने संतप्त प्रवाश्यानी थेट रुळावरून उतरून आंदोलन केले असून कल्याणला जाणारी लोकल रेल्वे ही थांबविली यामुळे लोकल रेल्वे विस्कळीत झाली आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईकरांचा खोळंबा, मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल अर्धा तास उशिराने

News Desk

मनोज मेहता यांचा मृत्यू, अंधेरी पुल दुर्घटनेत झाले होते जखमी

News Desk

मुंबईतील पाणी टँकरधारकांचा संप मागे

Aprna
महाराष्ट्र

युतीचा निर्णय मी आणि मुख्यमंत्री फडणवीस मिळून घेऊ – उद्धव ठाकरे

News Desk

शुभम देशमाने – 8689820571

मुंबई – आगामी निवडणुकांमध्ये भाजपसोबत युती करायची की नाही, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी मिळून घेऊ, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. युतीबाबत आजपासून चर्चेची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांबाबत शिवसेना-भाजपमध्ये युतीबाबत अनेक तर्कवितर्कांना सुरूवात झाली आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, शिवसेना-भाजपकडून प्रत्येकी तीन सदस्य युतीबाबत चर्चा करतील. जिल्हा परिषद निवडणुकीत युतीचे अधिकार स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहेत. आज निवडणुका जाहीर होणार असल्याने लवकरात लवकर चर्चा झाली तर ठीक नाहीतर कुठेतरी थांबवून एक निर्णय घ्यावा लागेल, अशी सूचनावजा इशाराही उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे. युतीबाबत अजून माझ्यापर्यंत काही आलेले नाही त्यामुळे शिवसेनेची निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे उद्धव यांनी सांगितले.

उद्धव यांचा राज ठाकरेंना टोला

महापालिका निवडणुकीत युती करण्याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी अनुकूलता दर्शवत भाजप हा आमचा शत्रू असल्याचे वक्तव्य केले आहे. त्याबाबत विचारले असता उद्धव म्हणाले, शिवसेनेबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज होते ते दूर होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे.

 

 

 

 

Related posts

‘मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून नाचवले जात आहेत’, सेनेचा भाजपवर हल्ला बोल

News Desk

‘तुम्हीच खरे देशभक्त’, असदुद्दीन ओवैसी यांची मोहन भगवंतांवर टीका

News Desk

अजब सरकारचे गजब फर्मान; म्हणे,कोंबड्यांचे पोस्टमार्टम करा

swarit