HW News Marathi
मुंबई

नको त्या आवस्थेत पाहिल्यामुळे भावाने केला बहिणीचा खून

पुणे: अल्पवयीन बहीण एका तरुणासोबत निर्जनस्थळी सेक्स करताना, भावाने पहिले आणि त्याचा राग अनावर होऊन त्याने अर्धनग्न अवस्थेतील बहिणीवर धारदार शस्त्राने तब्बल 40 वार करुन तिचा निर्घृण खून केल्याची घटना पोलिस तपासात उघडकीस आली आहे. याप्रकरणी 19 वर्षीय आरोपी तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली आहे. आरोपीने गुन्हयाची कबुली दिल्यानंतर त्यास चाकण पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.

चाकण पोलिसांना काही दिवसांपूर्वी खराबवाडी परिसरात एका निर्जन स्थळी 17 वर्षीय मुलीचा अर्धनग्न अवस्थेतील खुन झालेला मृतदेह सापडला होता. हल्लेखोराने सदर मुलीच्या शरीरावर विविध ठिकाणी तब्बल 40 वार करुन तिचा निर्घृण खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी अनेक दिवस तपास करुन ही त्यांच्या हाती आरोपी येत नव्हता. मात्र, याघटनेत कुटुंबातील व्यक्तीचा सहभाग असू शकतो यादृष्टीने तपास सुरु केल्यानंतर मृत मुलीच्या भावाचे वागणे, बोलणे पोलिसांना संशयास्पद वाटले. त्यामुळे त्याचा जबाब नोंदवला असता, त्याने सांगितलेली साक्ष व त्याचे घटनेच्या दिवसाचे मोबाईल लोकेशन यात पोलिसांना तफावत आढळून आली. त्यामुळे त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याने बहिणीचा खून केल्याची कबुली दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बच्चे कंपनीसाठी अनोख पुस्तक प्रदर्शन

swarit

गोखले पुलाचा ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

News Desk

कुर्ला ते विद्याविहार दरम्यान तांत्रिक बिघाड, वाहतूक २० मिनिटे उशिराने

News Desk
देश / विदेश

बिहारमध्ये राजकीय भूकंप

News Desk

नवी दिल्ली: बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. जेडीयूच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजीनामा दिला आहे. राज्यपाल के. एन. त्रिपाठी यांची भेट घेऊन त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. इतकेच नाही तर मोदींनी त्यांना भाजपमध्ये येण्याची आॅफरही दिली आहे. भ्रष्टाचाराशी आपण एकत्र लढू असेही मोदींनी म्हटले आहे.

तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपद न सोडण्यावर ठाम आहेत. आरोप असलेल्या मंत्र्यांसोबत काम करणे अशक्य असल्याचे नितिशकुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले आहे. बिहारच्या हितासाठी आपण काहीही करायला तयार आहे.

बिहारमधील जेडीयू-आरजेडी-काँग्रेस महायुती अवघ्या २० महिन्यांत तुटली आहे. लालू प्रसाद यादव यांनी ही चर्चा वायफळ असल्याचे म्हटले होते. महाआघाडी तुटण्याचा प्रश्नच नसल्याचे ते म्हणाले होते.

‘नितीशकुमारांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तेजस्वी यादव यांचा राजीनामा मागितलेला नाही. या प्रकरणात मीडियालाच अधिक स्वारस्य आहे. नितीशकुमार आमचे नेते आहेत. ‘महाआघाडीत फूट’ या मीडियातून पसरवल्या जाणाºया अफवा आहेत.’, असे लालूंनी काही वेळेपूर्वी म्हटले होते.

राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांची बुधवारी बैठक झाली. त्यानंतर लालू यादव म्हणाले, ‘बिहार सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. महाआघाडीत काहीही चलबिचल नाही. सगळ्या मीडियाच्या अफवा आहेत. नितीशकुमारांनी तेजस्वींचा राजीनामा मागितलेला नाही.’ तेजस्वी यादवही म्हणाले की मला कधीही राजीनामा मागितला गेला नाही. नितीशकुमारांनीही आज आमदारांची बैठक बोलावली आहे. लालू यादव व त्यांच्या कुटुंबावर रेल्वे निविदा घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तेजस्वी यादवांच्या राजीनाम्याची भाजपने मागणी केली होती. जेडीयूचे म्हणणे होते की तेजस्वी यांनी जनतेसमोर स्पष्टीकरण द्यावे.

Related posts

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरवाढीला ब्रेक; देशात मात्र…

News Desk

काँग्रेसच्या महाअधिवेशनला सुरुवात

News Desk

विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली शिक्षिका; प्रेमसंबंध उघड होताच केली आत्महत्या

News Desk