HW News Marathi
मुंबई

पाऊस आला रे…

मुंबई – आजचा दिवस राज्यासाठी समाधानाचा म्हणावा लागेल. कारण, आज राज्यातल्या बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झालं तर दुसरीकडे राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी (निकषासह) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलाय.

दक्षिणेत काही दिवसापुर्वी दाखल झालेल्या मान्सूनचे आज कोकण आणि पाठोपाठ मुंबई, पुण्यासह राज्यातील बहुतांश भागात आगमन झाले आहे. मुंबई, उपनगरात सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्याचबरोबर पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पालघर, नाशिक परिसरातील अनेक भागातही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

पुण्‍यात दुपारी एक वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. आजचा पाऊस हा मान्सूनचा पाऊस असून त्याने जोर धरला असल्याचे हवामान खात्यान स्पष्ट केलं. येत्या 24 तासांत मुंबई, पुण्यात मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी तळकोकणात दाखल झालेल्या मान्सूनने आगेकूच करत मध्य महाराष्ट्र, कर्नाटकच्या अंतर्गत भागात मुसंडी मारली. सह्याद्री डोंगरमाथ्यावर मान्सूनचे आगमन झाल्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबईसह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. येत्या 48 तासांत मध्य महाराष्ट्रातील उर्वरित भागासह मराठवाड्यात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, जळगाव, परभणी, नांदेड जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांचा ‘रेल रोको’, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

उच्च न्यायालयाची राजकीय पक्षांना नोटीस

Gauri Tilekar

आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक

News Desk