HW News Marathi
मुंबई

प्राप्तिकर विभागाचे संकेतस्थळ ‘हँग’

पुणे : करदात्यांना प्राप्तिकर विवरण (आयटी रिटर्न्स) भरण्याचा सोमवार शेवटचा दिवस असल्याने अनेकांची सकाळपासूनच धांदलउडाली होती. त्यातच प्राप्तिकर विभागाचे संकेतस्थळ सकाळी दहा वाजल्यापासून डाऊन झाल्यामुळे अनेक करदात्यांना रिटर्न्स भरण्यात अडचणी येत होत्या. देशभरामधून एकाच वेळी संकेतस्थळावर अनेकांनी प्रयत्न केल्याने सर्व्हरवर ताण आला होता.संध्याकाळपर्यंत हे संकेतस्थळ डाऊन असल्यामुळे अनेक नागरिक विवरण भरु शकले नाहीत. सुदैवाने विवरण भरण्याची मुदत आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

अर्थ मंत्रालयाने प्राप्तिकर विवरण दाखल करण्यासाठी ३१ जुलैची मुदत दिली होती. यंदा विवरण दाखल करण्यासाठी आधार कार्डबंधनकारक करण्यात आले होते. मात्र, शहरातील आधार कार्ड केंद्र बंद असल्याने आणि सुरू असलेल्या केंद्रांवरील सर्व्हर डाऊनअसल्याने नागरिकांना वेळेत आधार काढून घेता आले नाहीत. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत विवरण भरण्यासाठी धावपळ सुरु होती.

विशेष म्हणजे केंद्र शासनाने ही मुदत वाढवून दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. एरवी प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयांमध्ये स्वतंत्रकक्ष उभा करुन विवरण दाखल करुन घेतले जाते. मात्र, अलिकडील काळामध्ये आॅनलाईन रिटर्न्स भरण्याची सुविधा उपलब्ध करुनदेण्यात आल्यामुळे करदाते वैयक्तिक विवरण स्वत:च दाखल करतात. यासोबतच सीएंकडून आपले विवरण दाखल करुन घेतात. पॅनकार्डला आधार कार्ड जोडण्याच्याही सुचना प्राप्तिकर विभागाकडून करदात्यांना देण्यात आलेल्या होत्या. सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंतप्राप्तिकर विभागाचे संकेतस्थळ व्यवस्थित चालत होते. मात्र, दहा वाजता संकेतस्थळ डाऊन झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

एसटी आगारातून खाजगी वाहतूकीला परवानगी देणाऱ्या मंत्र्यावर कारवाई करा

News Desk

टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या तळमजल्यावर लागलेली आग आटोक्यात

News Desk

अंधेरी पोटनिवडणुकीत मालपा डोंगरीमध्ये जाऊन आशिष शेलारांनी मतदारांची घेतली भेट

Aprna
मुंबई

गोड्या पाण्यातील मच्छिमारांचे धरणे आंदोलन

News Desk

मुंबई – राज्यात परंपरागत गोड्या पाण्यात मासेमारी करणारे मच्छिमार विविध मागण्यांसाठी 2 ऑगस्ट रोजी आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आझाद मैदान येथे करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमारांचे कर्ज माफ करण्यासाठी समिती स्थापन करण्यात यावी. मत्स्यव्यवसायाची इत्यंभूत माहिती असणाऱ्या व्यक्तीला मत्स्यव्यवसाय मंत्री म्हणून नेमावे आणि महादेव जानकर यांच्याकडून हे पद काढून घ्यावे अशी मागणी यावेळी महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीच्यावतीने करण्यात आली.

Related posts

भावी पोलिसांसाठी मनसे आली धावून

News Desk

भिवंडीत राजलक्ष्मी कंपाउंडमध्ये भीषण आग

News Desk

मुंबईतील शेतकऱ्यांची यादी शासनाकडे नाही

News Desk