HW News Marathi
मुंबई

बनावट किन्नर विरोधात कारवाई करा- किन्नर माय ट्रस्टची मागणी

मुंबई – समाजात किन्नर असल्याचे सांगत सामान्य माणसाला फसवणाऱ्या व खऱ्या किन्नरांना मारहाण करून त्यांची लुबाडणूक करणाऱ्या गोरेगाव येथील बनावट किन्नरांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी किन्नर माय ट्रस्टच्या वतीने मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.

किन्नर माय ट्रस्टच्या अध्यक्षा सलमा खान यांना देखील धमकी देऊन 5 लाखाची खंडणी मागितल्याचा आरोप किन्नर माय ट्रस्टच्या सदस्यांनी केला आहे.

समाजात किन्नर दुर्लक्षित असून असे प्रकार घडल्यास त्यांची घृणा केली जाईल. असली व नकली किन्नर कोण याबाबत सामान्य जनतेमध्ये जनजागृती व्हावी व किन्नर समाजाला बदनामीपासून रोखण्यासाठी पत्रकार परिषदे घेतल्याचे या संस्थेच्या सदस्या प्रिया पाटील यांनी म्हटले.

या बनावट किन्नरविरोधात मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यामुळे आम्हाला सामाजिक कार्य करताना अडचणीला सामोरे जावे लागते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून अटक करावी अशी आमची मागणी असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विधानसभा अध्यक्षांवरील अविश्वास ठरावाला मुख्यमंत्र्यांचे विश्वास ठरावाने उत्तर

News Desk

साध्या वेषात मोहीम फत्ते !

News Desk

मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमास एन वॉर्ड मधून आजपासून सुरुवात

Aprna
देश / विदेश

मोदी, शहा नथुरामचे वारसरदार

News Desk

पाटणा( वृत्तसंस्था)-बिहारमधील सध्याच्या राजकीय भूकंपाचे सर्व खापर नितीकुमार यांच्यावर फोडत राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी मोदी व शहा यांनाही लक्ष्य केले आहे. ‘देशाला एकत्र आणण्यासाठी आज आपल्यात गांधीजी नाहीत, हे दुर्दैव आहे. मोदी आणि शहा नथुराम गोडसेच्या वारसदार असल्याचे लालू यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडीनंतर लालू यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी, शहा यांच्यासह नितीशकुमार यांच्यावर टिकास्र सोडले. नितीशकुमार यांचाउल्लेख ‘भस्मासूर’ असा करत, ही मॅच फिक्स होती, आमचं काहीच चुकलेलं नाही, असा पवित्रा लालूंनी घेतला.

Related posts

ना आम्ही शिवसेनेला प्रस्ताव दिला, ना शिवसेनेने आम्हाला !

News Desk

गोपाल कृष्ण गांधी उपराष्ट्रपदासाठी विरोधकांचे उमेदवार

News Desk

सर्वोच्च न्यायालयाच्या प्रख्यात वकील इंदिरा जयसिंह यांच्या घरावर सीबीआयचा छापा

News Desk