HW News Marathi
मुंबई

भाजपचं सरकार गेलं तरच अच्छे दिन: अजित पवार

कोपरगाव :राज्यातील जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेचे नेते नेमका कोणता प्रचार करतायेत तेच कळत नाही रोज उठुन एकमेकांविरोधी वक्तव्य करण्यातच यांचा वेळ जातोय …..उध्दव ठाकरे म्हणतायत शिवसेना पंचवीस वर्षे सडली मग तुम्हाला आता सुचल का ? ही तुमची दूरदृष्टी आहे का अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला….मुख्यमंत्र्यांनी कमरेखालचे वार करू नये असा सल्लाही पवारांनी दिला…. आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आणि कोपरगाव येथे आयोजीत केलेल्या राष्ट्रवादीच्या प्रचार सभेत अजित पवारांनी सेना भाजप वर चौफेर टिका केलीय…

राज्यातील मंत्र्याना सांगण्यात आलय की मंत्रीपद टिकवायच असेल तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकात जिंका नाही तर तुमच मंत्रीपद जाईल अशी तंबीच देण्यात आलीय..त्यामुळे सर्वच मंत्री राज्यात प्रचारात उतरलेत …मुख्यमंत्री तर घसा कोरडा पडे पर्यंत ओरडुन भाषणे करतायत…टिका करा मात्र घसा बसेल अस बेंबीच्या देठापासुन का ओरडताय जनता पळुन जाणार नाही… राज्यात टिका करतांना विचाराची लढाई विचारांनी करा कमरे खालचे वार करू नका असा सल्लाही पवारांनी दिलाय..

राज्यात पुण्याचे पालकमंत्रीच कबुल करताय की फडणवीस सरकाराच्या काळात आत्महत्या वाढल्या याला काय म्हणायच ….यांचा एक मंत्री म्हणतोय की आम्ही गुंडाना प्रवेश दिला त्यांना निवडणुकीनंतर सुधारा ….वा रे पठ्या ….तर मुख्यमंत्री म्हणातय की आम्ही जास्त गुंडांना प्रवेश दिला नाही मग थोड्या गुंडाना तर दिला ना असा मिश्कील सवाल करत भाजप हा नाकाने कांदे सोलणारा पक्ष असल्याच म्हटलय…

छत्रपती शिवाजी महाराज हे अठरापगड जातीचे दैवत होते आणि आजही आहे त्यांना कोणत्याही एका पक्षाने आपल्या पुरते मर्यादीत करण्याचा प्रयत्न करु नये असा सल्ला भाजपा सेनेला पवारांनी दिलाय तर त्यांचा हा प्रयत्न महाराष्ट्रातील जनता हाणुन पाडल्या शिवाय राहणार नसल्याचही पवार म्हणालेत. सरकार मधील दोन्ही पक्षांची भांडणे सुरु आहेत शिवसेना या सरकारचा पाठींबा काढणार आहे आणि बीजेपीच सरकार जाणार आहे आणि ते गेलेत पाहीजे तरच अच्छे दिन येतील अस पवार म्हणालेत ..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाकडून प्रताप सरनाईकांना दिलासा!

News Desk

‘या’ ४ पूल दुर्घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला

swarit

मुंबई पोलिसांच्या डोक्यावर लवकरच नव्या टोप्या

News Desk