HW News Marathi
मुंबई

भारतात मांसाहार बंदी केल्यास भूकबळी – जितेंद्र आव्हाड

मुंबई – मांसाहार बंदीबाबत वक्तव्य करून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा या वादाला तोंड फोडलंय… भारतात अजूनही 80 टक्के लोकं हे मांसाहारी आहेत, त्यामुळे मांसाहारावर बंदी आल्यास माझ्यासारख्या अनेकांचा भूकबळी जाईल, अशी दर्पोक्ती आमदार आव्हाड यांनी ट्विटरवर केली.

उत्तर प्रदेशमध्ये बहुमताने निवडून आलेल्या भाजपने योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या कट्टर हिंदुत्त्ववादी प्रतिमा असलेल्या नेत्याला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली आहे. गोहत्याविरोधक असलेल्या आदित्यनाथांनी अवैध कत्तलखान्यावर कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा मांसाहार आणि शाकाहार यावरुन वाद सुरु झाले आहेत.

भारताला आता शाकाहारींचा देश बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत आणि उत्तरप्रदेशमध्ये त्याच दिशेने वाटचाल सुरु आहे. हिंदूराष्ट्रच्या दिशेने हे पाऊल असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. देशातील ८० टक्के जनता हे मांसाहार करते. त्यामुळे यावर बंदी आल्यास अनेकांचा भूकबळीच जाईल असेही त्यांनी नमूद केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील आव्हानांना सामोरे जाताना समतोल भूमिका महत्त्वाची – जिल्हाधिकारी संपदा मेहता

News Desk

मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

News Desk

मुंबईचे रस्ते तातडीने दुरुस्तीसाठी साडेपाच हजार कोटींचा निधी! – मुख्यमंत्री

Aprna