HW News Marathi
मुंबई

मुंबईला पुन्हा हाय अलर्टचा इशारा

मुंबई – मुंबईला पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याची शक्यता कोस्टगार्डनं वर्तवलीय. त्यामुळं कोस्टगार्डने मुंबई पोलिसांसह सर्व सुरक्षा यंत्रणांना अलर्ट जारी केले आहे. त्यानुसार, ISIS चे तीन संशयित दहशतवादी मुंबईमार्गे भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे. सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

भारतीय कोस्टगार्डने मुंबई पोलिसांसह सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यात म्हटले आहे, की आयएसआयएसचे तीन संशयित दहशतवादी 26/11 प्रमाणेच मुंबईवर हल्ला करण्याची शक्यता आहे. ते समुद्रमार्गे घुसखोरी करु शकतात. कोस्टगार्डच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘आम्ही बऱ्याच दिवसांपासून समुद्रातील संशयास्पद हलचालींवर लक्ष ठेवून आहोत. यादरम्यान, समुद्रात थुराया सॅटेलाइट फोनद्वारे गप्पांचे काही अंश मिळाले.’

मंगळवारी मिळालेल्या माहितीनंतर संशयित दहशतवाद्यांचे नाव आणि त्यांच्या संबंधिची इतर माहिती यंत्रणांना देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसरा, कोस्टगार्डने फॅक्सद्वारे माहिती दिली आणि सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिस तपास करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

परफ्यूम एक्सपर्ट मोनिका घुरडेच्या खूनाचा छडा

News Desk

एलएलएमच्या विद्यार्थ्यांच्या एक्सट्रा लेक्चरमध्ये प्राध्यापकांची दांडी

swarit

ग्राहकांना मोबाईलवरील एसएमएसद्वारे पत्त्याची दुरुस्ती करता येणार

News Desk
महाराष्ट्र

…म्हणून सोलापूरात विरोधकांच्या संघर्ष यात्रेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

News Desk

अभिराज उबाळे

– शेतकऱ्यांची देणी थकवणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना समज देऊ – राधाकृष्ण विखेपाटील

पंढरपूर – स्थानिक काँग्रेसच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी जर शेतकऱ्यांची देणी थकवलेली असतील तर हे चुकीचे आहे. सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे अशी देणी असतील तर आपण त्यांना योग्य समज देऊ असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय. विरोधी पक्षांच्या सोलापूरमधील संघर्ष यात्रेकडे त्यामुळेच शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याची चर्चा सुरू झालीय.

विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आंदोलनं करत आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची देणी काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी थकवलीत. जिल्हा बँकेची नियमबाह्य कर्ज देखील या नेत्यांनी घेतलेली आहेत. यावर विखे पाटलांना छेडले असता त्यांनी हे दुर्दैव असल्याची कबुली देत, आपण यामध्ये लक्ष घालून हि देणी देण्यास भाग पाडू असे आश्वासन दिले. तसेच शेतकऱ्यांची एफ आर पी थकवणाऱ्यांवर साखर आयुक्तांनी कारवाई करावी असा सल्ला त्यांनी प्रशासनास दिला.

एकीकडे कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी दबलेला आहे. आणि दुसरी कडे शेतकऱ्यांनी आपल्या हक्काचे पैसे मिळत नाहीत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे काँग्रेस आमदार भारत भालके यांच्याकडे संघर्ष यात्रेच्या मंगळवेढ्याच्या सभेचे आणि पंढरपूरचे नियोजन होते. मात्र काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देणी थकवल्याने शेतकऱ्यांनी या संघर्ष यात्रेकडे सपशेल पाठ फिरवलीय. एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी कर्ज माफी करण्याची मागणी करतानाच त्यांच्याच नेत्यांकडे देणी थकल्याने सोलापुरात त्यांची चांगलीच गोची झाल्याचे चित्र दिसत आहे . या कारणांमुळे मंगळवेढा आणि पंढरपूर मधून या यात्रेने काढता पाय घेतल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

Related posts

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन

Aprna

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु – हेमंत नगराळे

News Desk

राज्यपालांकडे १२ नावांची यादी पोहोचली, प्रतीक्षा निर्णयाची!

News Desk