HW News Marathi
मुंबई

मालगाडीवर चढून सेल्फी काढताना १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

ठाणे- अंबरनाथ येथे मालगाडीवर चढून सेल्फी काढण्याच्या नादात एका १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. इलाराज अनिकेत असे मृत तरुणाचे नाव आहे. मालगाडीवर चढून सेल्फी घेत असताना ओव्हर हेड वायरचा शॉक लागून तो होरपळला होता. उपचार सुरू असताना शनिवारी त्याचा मृत्यू झाला. अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान बी-केबीन येथे शुक्रवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास या तरुणाने चक्क उभ्या असलेल्या मालगाडीच्या डब्यावर चढून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ओव्हरहेड वायरचा शॉक लागून तो गंभीर जखमी झाला होता. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली होती.सेल्फी घेणा-या ईलाराजला मालगाडीच्या गार्डने हटकले. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष करून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. तो सेल्फी घेण्याचा प्रयत्नात असताना त्याचा ओव्हरहेड वायरला हात लागून त्याला विजेचा शॉक बसला व तो तडफडून खाली पडला.

गंभीर जखमी अवस्थेत अनिकेतला त्याच्या मित्रांनी रिक्षामध्ये टाकून अंबरनाथच्या बीजांकुर या खासगी रुग्णालयात नेले होते. मात्र अनिकेत गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईला पाठवले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘कोरोना’चा फटका आयपीएलला बसणार?

swarit

मुंबईतल्या ५०० फुटांपर्यतच्या घरांना करमाफी

News Desk

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची भारतीय मानक ब्युरोवर सदस्यपदी नियुक्ती

News Desk
मुंबई

दहीहंडीला मूक दिन पाळण्याचा निर्णय

News Desk

मुंबईः यंदा १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन आणि दहीकाला एकाच दिवशी असले, तरी याच दिवशी राज्यातील प्रकाश आणि ध्वनी व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रोफेशनल ऑडियो अँड लायटिंग असोसिएशन या संघटनेने (पाला) राज्यव्यापी मूक दिन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याने होणाऱ्या समस्यांविरोधात स्वातंत्र्य दिन व दहीहंडी उत्सवादिवशी लाउडस्पीकर व लायटिंग बंद ठेवणार असल्याचे पालाने मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. लाऊडस्पीकरच्या उद्योगावर भवितव्य अवलंबून असणारी अनेक कुटुंबे आहेत. मात्र, राज्यातील लाऊडस्पीकरच्या बंदीमुळे प्रकाश, ध्वनीशी संबधित असलेला हा उद्योग अडचणीत सापडला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ७५ डेसिबलचे बंधन पाळावे लागते. मात्र वाहतुकीच्या आवाजांसह वातावरणातील ध्वनीची पातळी वाढत आहे, त्यामुळे या निर्णयावर पुनर्विचार व्हावा, अशी मागणी ‘पाला’ संघटनेने केली आहे.

Related posts

चहा पिताना धक्का लागल्यामुळे पुण्यात तरुणाचा खून

News Desk

प्रकाश आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षतेचे धडे आम्हाला देऊ नयेत | पवार

Gauri Tilekar

हे आहेत यंदाच्या नवरात्रीचे ९ रंग

News Desk