HW News Marathi
मुंबई

लोणावळ्यात खासगी बस उलटून 26 प्रवासी जखमी, 5 गंभीर

लोणावळा – वाहतूकीचे नियम सांगणारे फलक जागोजागी लावूनही वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे मोठे अपघात होतात. असाच अपघात आज लोणावळ्यात झाला. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एका खासगी ट्रॅव्हेल्स कंपनीची बस तीक्ष्ण वळणावर उलटली आहे. लोणावळा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या या प्रकारात 26 प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले जात असून त्यापैकी 5 जणांची परिस्थिती गंभीर आहे.

लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीत पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर वलवण ब्रिजवर हा अपघात घडला आहे. सिद्धेश्वर ट्रॅव्हेल्स कंपनीची बस क्रमांक – MH-04/GP/4747 मुंबईहून कराड (सातारा) च्या दिशेने जात होती. याचवेळी तीक्ष्ण वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस उलटली. दुपारी 12 च्या सुमारास झालेल्या या अपघातातील जखमींना उपचारासाठी लोकमान्य हॉस्पिटल (पुणे) येथे दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 5 जणांची परिस्थिती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गंभीर जखमींमध्ये 2 लहान मुले, 2 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

स्वदेशी आर्ट अँड क्राफ्ट फेस्टिवल

News Desk

हजारों कोटींची जमीन खाजगी कंपनीला दिली फक्त 54 कोटीत, काँग्रेसच्या मंत्र्यांचा प्रताप  

News Desk

बेस्ट कर्मचाऱ्यांना पालिकेची दिवाळी भेट

News Desk
देश / विदेश

मोदी, शहा नथुरामचे वारसरदार

News Desk

पाटणा( वृत्तसंस्था)-बिहारमधील सध्याच्या राजकीय भूकंपाचे सर्व खापर नितीकुमार यांच्यावर फोडत राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी मोदी व शहा यांनाही लक्ष्य केले आहे. ‘देशाला एकत्र आणण्यासाठी आज आपल्यात गांधीजी नाहीत, हे दुर्दैव आहे. मोदी आणि शहा नथुराम गोडसेच्या वारसदार असल्याचे लालू यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडीनंतर लालू यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी, शहा यांच्यासह नितीशकुमार यांच्यावर टिकास्र सोडले. नितीशकुमार यांचाउल्लेख ‘भस्मासूर’ असा करत, ही मॅच फिक्स होती, आमचं काहीच चुकलेलं नाही, असा पवित्रा लालूंनी घेतला.

Related posts

ना आम्ही शिवसेनेला प्रस्ताव दिला, ना शिवसेनेने आम्हाला !

News Desk

गोपाल कृष्ण गांधी उपराष्ट्रपदासाठी विरोधकांचे उमेदवार

News Desk

सर्वोच्च न्यायालयाच्या प्रख्यात वकील इंदिरा जयसिंह यांच्या घरावर सीबीआयचा छापा

News Desk