HW News Marathi
मुंबई

वाल्मिकी नगरमधील झोपड्यांच्या सर्वेक्षण काम सुरू करा- राज्यमंत्री रविंद्र वायकर

उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे गृहनिर्माण विभागाला आदेश

– विद्यापीठाच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणास दोषी असणार्‍या तत्कालिन अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्‍चित करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना आदेश

मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील जागेवर अतिक्रमण करुन वसलेल्या वाल्मिकी नगरमधील झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी येथील झोपड्यांच्या सर्वेक्षणाचे काम विद्यापीठाच्या मदतीने तात्काळ सुरू करा, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण तसेच गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी गृहनिर्माण विभागाचे अवर सचिव पारकर यांना दिले. त्याचबरोबर या अतिक्रमणास दोषी असणार्‍या तत्कालिन अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात यावेत, असे आदेश वायकर यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना आदेश.

मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलामध्ये झालेले (वाल्मिकी नगर) अतिक्रमण निष्कासित करण्याबाबत मंगळवारी राज्यमंत्री यांच्या दालनामध्ये बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपरमुख्य सचिव सिताराम कुंटे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अहिरे, मुंबई विद्यापीठाचे सचिव डॉ. एम.ए.खान, गृहनिर्माण विभागाचे अवर सचिव पारकर आदि अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुंबई विद्यापीठाची सुरक्षा असतानाही विद्यापीठाच्या जागेवर एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले कसे? विद्यापीठाने संरक्षण भिंत का बांधली नाही? असे प्रश्‍न राज्यमंत्री वायकर यांनी उपस्थित केले. याबाबत माहिती देताना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांनी सांगितले की,‘१९९८ पासून विद्यापीठाच्या या जागेवर अतिक्रमण सुरू झाले. २००७ मध्ये अतिक्रमण दूर करण्यासाठी पोलिसांच्या मदतीने झोपड्या निष्कासितही करण्यात आल्या. परंतु त्यावेळी संपुर्ण झोपडया निष्कासित करण्यात आल्या नव्हत्या. ज्या झोपडयांचे निष्कासन करण्यात आले होते, त्या झोपड्या पुन्हा रातोरात उभ्या राहिल्या. त्यामुळे या जागेवर कुंपण घालणे शक्य न झाल्याची माहिती खान यांनी राज्यमंत्र्यांना दिली. ही जागा विद्यापीठाची असल्याने या जागेवर एसआरए योजना राबविता येणार नाही, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी अहिरे यांनी दिली.

विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या या झोपड्यांचे निष्कासन करायचे असल्याने त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे. यासाठी येथील झोपड्यांचे पात्र तसे अपात्र असे वर्गीकरण करण्यासाठी गृहनिर्माण विभागातर्ङ्गे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी सुचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे केली.

त्यानुसार गृहनिर्माण विभागाने मुंबई विद्यापीठाच्या मदतीने सर्वेक्षणाचे काम तात्काळ सुरू करावे. वाल्मिकी नगरमधील पात्र तसेच अपात्र झोपड्यांची यादी तयार करावी. त्यानंतर येथील पात्र झोपड्यांचे पुनर्वसन कसे करावे याबाबतचा प्रस्ताव तयार करुन तो शासनाकडे सादर करण्यात यावा, असे आदेश राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी गृहनिर्माण विभागाला दिले. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या या जागेवरील अतिक्रमणास जबाबदार असणार्‍या विद्यापीठातील तत्कालिन अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्‍चित करुन गृहनिर्माण विभाग तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अभिप्रायासह कार्यवृत्त शासनाकडे पुढील निर्णय घेण्यासाठी सादर करण्यात यावे, असे आदेश वायकर यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dongri Building Collapsed : ‘बी’ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त निलंबित

News Desk

अंधेरीमध्ये व्यावसायिक इमारतीला आग

swarit

एसटी बस मुंबईच्या पावसात अडकली

News Desk