HW News Marathi
मुंबई

वाशिंद स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेले रोको!

मुंबई आसनगाव स्थानकाजवळ मंगळवारी दुरांतो एक्सप्रेस घसरून झालेल्या अपघातानंतर टिटवाळा-आसनगाव लोकलसेवा बंद आहे.तब्बल ७२ तास उलटूनही सेवा ठप्प असल्याने शुक्रवारी सकाळी प्रवाशांचा उद्रेक झाला. संतप्त प्रवाशांनी वाशिंद स्थानकात रेलरोको केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत जमावाला शांत केल्याने परिस्थिती आटोक्यात राहिली.

वाशिंद स्थानकात संतप्त प्रवाशांनी दादर-अमृतसर एक्सप्रेस तब्बल ३५ मिनिटं रोखून धरली होती. तीन दिवसांपासून बंद असलेली सेवा पूर्वपदावर यायला आणखी आठ दिवस लागतील, असं रेल्वेकडून सांगण्यात आल्याने या आंदोलनाचा भडका उडाल्याचे कळते.

सध्या कसारा ते टिटवाळा हा मार्ग बंद असला तरी टिटवाळ्याहून कसाराकडे जाणारा मार्ग सुरु आहे. या मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जात असून प्रवाशांच्या सोयीसाठी या एक्सप्रेसना प्रत्येक स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. मात्र मुंबईकडे येण्यासाठी पर्याय नसल्याने प्रवाशांमध्ये असंतोष आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईकरांसाठी खुशखबर जुलै महिन्यात म्हाडाची जाहिरात प्रसिद्ध होणार

News Desk

शेतकऱ्यांचा लाल सागर मुंबईत धडकला, सरकारची धावपळ सुरू

News Desk

रविवारीचा मेगाब्लॉक शनिवारीच 

swarit