HW News Marathi
मुंबई

सुनील रामानंद यांची बदली रद्द

पुणे :पुण्याचे सहआयुक्त सुनिल रामानंद यांची बदली रद्द करण्यात आली आहे. त्यांच्या जागी बदली झालेले रवींद्र कदम यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रामानंद यांची दोन दिवसांपूर्वीच सीआयडीला बदली झाली होती.रामानंद यांनी शहरात चांगले काम करुन गुन्हेगारीचे कंबरडे मोडले होते. त्यामुळे शहरातील अनेक संघटनांनी त्यांच्या बदलीला विरोध केला होता. यामुळे राज्य शासनाने सोमवारी त्यांची बदली रद्द केली होती.दरम्यान पोलिस दलातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदल्या करण्यात आल्या. झोन तीनचे पोलिस उपायुक्त बसवराज तेली यांची बदली विशेष शाखा दोनला करण्यात आली.तर विशेष शाखा एकचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांची बदली झोन तीनला करण्यात आली.विशेष शाखा दोनचे पोलिस उपायुक्त श्रीकांत पाठक यांची बदली विशेष शाखा एकला करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हार्दिक पटेलवर शाई फेक

News Desk

केडीएमसीचे नगरसेवक करणार केरळसाठी एक महिन्याचे वेतन दान

News Desk

विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून ३७० झाडांचे वृक्षारोपण

News Desk
महाराष्ट्र

अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी सायकलवरून वाटले सातबारा

News Desk

अकोला – मंगळवारी महसूल दिनानिमित्त स्वत: येथील जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय शेतकऱ्यांच्या वेषात अकोला तालुक्यातील चांदूर गावात सायकलने गेले आणि त्यांनी शेतकऱ्यांना संगणकीकृत सात-बारा उताऱ्यांचे वितरण केले.

सात-बारा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यामुळे शासनाने सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला. काही जिल्ह्यांत हे काम अद्याप अपूर्ण असले, तरीही अकोला जिल्ह्यात ते पूर्ण झाले असून, हा संगणकीकृत सात-बारा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी सायकलने चांदूर गावात पोहचले. या वेळी त्यांनी संगणकीकृत सात-बाराचे शेतकऱ्यांना वितरण केले. शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेणे व त्यांचे मनोधैर्य वाढविणे, हादेखील या उपक्रमामागील उद्देश आहे.

Related posts

संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार!

News Desk

सांगली जिल्ह्यातील बाबरवस्ती शाळा आदर्श पुरस्काराने सन्मानित

News Desk

MPSC पुस्तके तोंडावर फेकून आंदोलन करणार ! राम सातपुतेंचा इशारा

News Desk