HW News Marathi
मुंबई

संविधानाला हात लावाल तर खबरदार; देशातील विरोधीपक्ष नेत्यांचा संविधान बचाव रॅलीत इशारा

संविधानाला हात लावाल तर खबरदार असा इशारा देशातील विरोधीपक्ष नेत्यांनी आज मुंबईत काढलेल्या संविधान बचाव रॅलीत केंद्र सरकारला दिला. केंद्र सरकारच्या संविधान विरोधी व संविधान बदलण्याच्या भूमिकेवर आपण सर्व एक असल्याचा निर्धार करत आपली एकजूट दाखवून दिली. या नेत्यांनी मुंबईच्या रस्त्यावर दिलेल्या संविधान बचाव, देश बचावच्या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला.

या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,शरद यादव, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, गुजरातचे गुजरातचे आमदार हार्दिक पटेल, राजू शेट्टी, अल्पेश ठाकूर, डाव्या पक्षाचे डी. राजा, सीताराम येचुरी, अशोक चव्हाण,राधाकृष्ण विखे पाटील, दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे जयंत पाटील, कपिल पाटील, जोगेंद्र कवाडे, बाबा आढाव, तुषार गांधी यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, पदाधिकारी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते.

मुंबई विद्यापीठाच्या जवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात झाली. तर समारोप गेट ऑफ इंडिया जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाला.

रॅलीच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, राष्ट्र सेवादलाचे महिला, पुरुष कार्यकर्ते होते. तर खासदार सुप्रिया सुळे, ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या हातात संविधान बचावचे मोठे बॅनर घेत मार्गक्रमण केले. त्यांच्या सोबत असलेल्या महिलांनी संविधान बचावच्या घोषणा देत आजूबाजूचा परिसर दणाणून सोडला. तर त्यामागे काँग्रेसचे नेते, राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, डाव्या पक्ष , संघटनेचे नेते, यांच्यासह हार्दिक पटेल यांनी या रॅलीत सहभाग घेतला.

त्यापूर्वी देशातील तमाम दिगग्ज नेत्यांनी गेट ऑफ इंडियाच्या समोर बसून सरकारच्या संविधान विरोधी भूमिकेचा निषेध नोंदवला.

शरद पवार यांनी केंद्राच्या संविधान विरोधी भूमिकेवर हल्ला चढवत संविधान वाचले तरच देश वाचणार असून त्यासाठी आज आम्ही सर्व संविधानाला मानणारे एकत्र आलो असून हा एक केंद्र सरकारला मोठा इशारा असल्याचेही पवार म्हणाले. तर माजी खासदार शरद यादव यांनीही केंद्र सरकारच्या फसिस्टवादी चेहऱ्याचा आता बुरखा फाटला असून देशातील तमाम उपेक्षित घटकांचे अधिकार या सरकारने धोक्यात आणले असून त्यांच्या विरोधातील लढाईची ही सुरवात असल्याचे म्हटले..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

मोबाईलप्रमाणे आता सेट टॉप बॉक्सचे कार्ड देखील बदलता येणार

News Desk

शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉनचे आयोजन

swarit