HW News Marathi
मुंबई

गोरेगावमध्ये इमारत कोसळून १ मृत्यू, ८ जण जखमी

मुंबई | गोरेगाव पश्चिम येथील आझाद मैदाना जवळील एक निर्माणाधीन इमारत कोसळली आहे. ही इमारत कोसळून एकाचा मृत्यू झाला असून अनेक ८ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या इमातरतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडल्याची भीती माहिती मिळाली आहे. गोरेगावात ही दुमजली इमारत कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून, बचावकार्य सुरू आहे. जखमींना सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोरेगावातल्या म्हाडा वसाहतीत सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. २२ वर्षीय रामू नावाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे, तर इतर ८ जण जखमी आहेत. मंगल बनसा(३५), मुन्ना शेख(३०), शिनू (३५), हरी वडार (३), शंकर पटेल(२१), सरोजा वडार(२४), रमेश निशाद (३२) जखमींची नावे आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तर उरलेल्या तुरीचे शेतकऱ्यांनी पकोडे तळायचे का? : विखे पाटील

swarit

तिच्या गुप्तांगात खुपसली लाठी म्हणून तिचा मृत्यू

News Desk

Dahi Handi | कुर्ल्यामध्ये त्रिमूर्ती सेवा मंडळ गोविंदा पथकाने फोडली मानाची हंडी

News Desk
देश / विदेश

इंडोनेशियामध्ये त्सुनामीमुळे १६८ जणांचा मृत्यू

News Desk

जकार्ता | इंडोनेशियात त्सुनामीचा कहर पाहायला मिळाला आहे. या भयंकर त्सुनामीमध्ये जवळपास १६८ जणांच्या मृत्यूची नोंद झाला असून ६०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर समुद्राच्या आत भूस्लखन होऊन त्सुनामीमध्ये आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान त्सुनामीची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. क्रॅकाटो या बेटाची ज्वालामुखीच्या उद्रेक्रातून निर्मिती झाली आहे. याच ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होऊन समुद्राच्या तळाशी भूस्लखन झाल्यान त्याचे रुपांतर मोठ्या त्सुनामीमध्ये झाले. सन १८८३ मध्ये झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून या बेटाची निर्मिती झाली होती.

इंडोनेशियाचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रवक्ते सुतोपो पुरवो नुग्रोहो यांनी इंडोनेशियात आलेल्या त्सुनामीची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुंदा सामुद्रधुनी भागातील जवळपास ६२ लोकांचा या त्सुनामीत मृत्यू झाला, तर ५८४ लोक जखमी झाले. दोन नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. सुमात्रा आणि जावा बेटाच्या किनाऱ्यावरील बऱ्याच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

इंडोनेशियातील भूवैज्ञानिकांनी या त्सुनामीच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. समुद्राच्या भरतीचा काळ आणि समुद्राच्या तळाशी झालेले भूस्लखन यामुळे त्सुनामी आली असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. सुंदा सामुद्रधुनी जावा आणि सुमात्रा या दोन बेटांच्या बरोबर मध्यभागी आहे. याच ठिकाणी अनाक क्रॅकाटो हे छोटसे बेट आहे. याच ठिकाणी त्सुनामी आली. या भागातील भूगर्भामध्ये मोठ्या हालचाली होत असतात. त्यामुळे इंडोनेशियात भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्याचमुळे या भागाला ‘पॅसिफिक रिंग ऑफ फायर’ असे संबोधले जाते.

Related posts

इस्रोकडून तीन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीभोवतीच्या कक्षेत केले स्थापित

Aprna

मोदी सरकारने काँग्रेसला संपवण्यासाठी सर्व प्रयत्न केले | सोनिया गांधी

News Desk

आयसीएसई बोर्डाकडून दहावी-बारावीचा निकाल आज होणार जाहीर

News Desk