HW News Marathi
Covid-19

२ किमीच्या परिघातच संचाराची अट रद्द, घराजवळ खरेदी करण्याचे पोलिसांचे आवाहन

मुंबई | राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे घरापासून दोन किलोमीटर परिघातच प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी असे मुंबई पोलिसांनी म्हटले होते. मात्र यावर नागरिकांकडून तीव्र विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने ही अट मागे घेतली आहे. आता घराजवळच खरेदी करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. याबद्दल पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. असे वृत्त लोकसत्ता वृत्तपत्राने दिले आहे.

२ किलोमीटर परिघाबाबतच्या मुंबई पोलिसांच्या आदेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काल (३ जुलै) झालेल्या चर्चेत तीव्र नाराजी व्यक्त केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही पोलिसांच्या या कृतीबद्दल आक्षेप घेतल्यावर घराजवळच खरेदी करा, असे आवाहन मुंबई पोलीस आयुक्तांनी केले. तर २ किमीची अट रद्द केल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ठाणे जिल्ह्य़ात पुन्हा टाळेबंदी लागू करणे, मुंबईत घरापासून २ किमीच्या आत प्रवासास मुभा देणे आणि कोणतीही पूर्वसूचना न देता वाहन चालकांच्या विरोधात कारवाई करणे यावरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे ही अट आता रद्द करण्यात आली आहे. आणि नागरिकांना घराजवळच आवश्यक ते सामान खरेदी करण्याचे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sputnik V लसीची पहिली बॅच भारतात दाखल!

News Desk

मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपूरला जाणार, भाजपसह वारकऱ्यांचा मात्र विरोध

News Desk

कोरोना परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील ‘या’निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य सरकराचा निर्णय

News Desk