HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपूरला जाणार, भाजपसह वारकऱ्यांचा मात्र विरोध

पंढरपूर | आषाढी एकादशीच्या वारीवरून मोठं राजकरण झालं होतं. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पायी वारी करण्यास राज्य सरकारने विरोध केला होता. मात्र,. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह आषाढी एकादशीच्या पूजेला जाणार आहेत. आषाढीचा सोहळा मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक पध्दतीने साजरा केला जाणार आहे. मानाच्या दहा पालख्यातील ४०० भाविकांना वारीसाठी पंढरपुरात प्रवेश दिला जाणार आहे. सर्व प्रथा आणि परंपराचे जतन करत यंदाचा आषाढी एकादशीचा सोहळा साजरा केला जाणार आहे.

येत्या २० जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होणार आहे. दोन वर्षापासून राज्यात कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा आणखी प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून राज्य सरकारने आषाढी पायी पालखी सोहळा व पंढरपूरची यात्रा रद्द केली होती

आषाढीची श्री विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. मंदिर समितीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मुंबईत भेट घेत निमंत्रण दिले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंदिर समितीच्या या निमंत्रणाचा नम्रपणे स्विकार करत महापूजेसाठी पंढरपूरला येणार असल्याचे सांगितले, अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. महापूजेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे १९ जुलैला पंढरपुरात मुक्कामीच येणार आहेत.

मोठा पोलिस बंदोबस्त असणार

मुख्यमंत्र्यांना महापूजेला भाजपसह विविध वारकरी संघटनांनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिर समितीने आषाढीची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मंदिरात संत कान्होपात्रा समाधी जवळ तरटीच्या रोपाची लागवड केली जाणार असल्याचे ही गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, सदस्य संभाजी शिंदे,ज्ञानेश्वर महाराज जळगाकर आदी उपस्थित होते.

काय म्हणाले होते तुषार भोसले?

औरंगजेबापेक्षाही राज्यातलं सरकार अत्याचारी आहे. मुघलांनी सुद्धा वारकऱ्यांचे इतके हाल केले नव्हते. भागवत धर्माची भगवी पताका घेऊन जाणाऱ्या बंडातात्या आणि वारकऱ्यांना अटक करणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?, असा सवाल तुषार भोसले यांनी विचारला होता.

उद्धव ठाकरे- अजितदादा आता परिणाम भोगायला तयार रहा

तुषार भोसले यांनी शिवसेनेसा देखील लक्ष्य केलं. बंडातात्यांच्या अटकेनंतर शिवसेनेला आता भगवा झेंडा हातात घेण्याचा अधिकार नाही, असं ते म्हणाले. तर सरकारला इशारा देताना उद्धवजी आणि अजित पवार आता परिणाम भोगायला तयार रहा, असं ते म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम

News Desk

“डिस्को, पब ही आरोग्य केंद्र आहेत का?”-भाजपचा सवाल

News Desk

देशात गेल्या २४ तासांत ११,९२९ सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद

News Desk