HW News Marathi
मुंबई

विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून ३७० झाडांचे वृक्षारोपण

मुंबई | जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित ‘जाणीव वसुंधरेची ‘ या प्रकल्पा अंतर्गत लोकनायक जयप्रकाश नारायण कुष्ठरोग हॉस्पिटल, वसई येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये जाणीव ट्रस्टचे पदाधिकारी, साठ्ये महाविद्यालयाच्या NSSयुनिट व Ncc युनिटचे विध्यार्थी, साठ्येचे माजी विद्यार्थी , वर्तक कॉलेज, सेंट पीटर्स कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज अशा विविध संस्थांमधून १२५ विद्यार्थ्यांनी श्रमदान केले.

यावेळी ३७० झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले. यामध्ये मोगरा व आंबा या झाडांचा समावेश होता. लोकनायक जयप्रकाश नारायण कुष्ठरोग निर्मुलन संस्था यांनी ही रोपे उपलब्ध करून दिली होती . डॉ जगदीश सामंत यांना आदरांजली वाहून सर्व स्वयंसेवकांना विविध गटांमध्ये विभागणी करून झाडे व हत्यारे घेऊन सर्वजणांनी सकाळी साडेदहा च्या सुमारास वृक्षारोपणाला सुरवात केली. दीड वाजेपर्यंत वृक्षारोपण केले व सर्वांनी तेथे एकत्रित भोजनाचा आनंद घेतला व पुन्हा जोमाने साडेचार वाजेपर्यंत वृक्षारोपण केले, त्यानंतर लोकनायक ट्रस्टच्या ट्रस्टींनी मुलांशी सुसंवाद साधत वृक्षारोपणाची आपल्याला प्रदूषणावर तसेच ग्लोबल वॉर्मिंग वर मात करण्यासाठी आज आपण केलेले काम किती प्रशंसनीय आहे हे सांगत आपण सर्वांनी लावलेल्या झाडांची जवाबदारी संस्था घेईल व आपण सर्वांनी वेळात वेळ काढून येथे येऊन झाडांची काळजी घ्यावी याची सर्वांना जाणीव केली, सर्व उपस्थितांनी ही जवाबदारी आम्ही घेऊ असे आश्वासन दिले, त्यानंतर सुनिल पाठक (ट्रस्टी, जाणीव) यांनी डॉ सामंत यांचा वसा आपण चालवत आहोत असे सांगत सर्वांना ट्रस्ट व ट्रस्टच्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली व कार्यक्रमाच्या नियोजन व त्यामागील उद्दिष्टांची सर्वांना माहिती दिली.

मुंबई जिल्हा समन्वयक NSS विनोद गवारे (सहाय्यक प्राचार्य साठ्ये महाविद्यालय) यांनी उस्फुर्तपणे प्रेरणागित घेत आपली व समाजाच्या प्रति असलेली बांधिलकी दाखवून दिली. प्रा बबन मोहिते, सचिन शिगवण व प्रा गौरांग राजवडकर , प्रा कस्तुरी मेढेकर (साठ्ये महाविद्यालय), जिल्हा समन्वयक प्रा भीमराव पेडकर वर्तक कॉलेज, प्रा वैती सेंट पीटर कॉलेज, प्रा अभ्यंकर न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज यांनी सर्वांना मार्गदर्शन केले, जाणीव ट्रस्ट च्या वतीने सर्वांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. जाणीव ट्रस्टच्या सुनील पाठक यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी योगेश पाटील, डॉ परुळेकर (लोकनायक जयप्रकाश नारायण ट्रस्ट) व राम परब, आरती पाठक (ट्रस्टी जाणीव) आणि मयूर पवार या सगळ्यांनी बहुमूल्य सहकार्य केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आरोग्यमंत्र्यांनी दिली कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची आकडेवारी

swarit

संविधानाची प्रत जळणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात लोककलावतांचा निषेध मोर्चा

News Desk

पोलिसांवर झालेल्या बोचरी टीकेचा पोलीस हवालदार बळी !

News Desk
राजकारण

सामाजिक न्यायाची पुंगी गाजराची पुंगी ठरू नये | उद्धव ठाकरे

News Desk

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला लक्ष्य केले आहे. मराठा असो, धनगर असो किंवा महाराष्ट्रातील वंजारी, महादेव कोळी, गोवारी, जंगम असो, यांना एकत्रित न्याय द्या, हेच आमचे मागणे आहे. या सर्वच मागण्या एकत्र करून एकदाच काय ती शिफारस एकमताने मंजूर करून संसदेकडे पाठवा. सामाजिक न्यायाची पुंगी गाजराची पुंगी ठरू नये. प्रश्न पोटातील आगीचा आहे. पोटाला जात चिकटवण्याची वेळ सरकारने आणली आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुखांनी सामनातील अग्रलेखातून भाजप सरकारवर केली आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

मराठा आरक्षणाबाबत कोंडी कायम असल्याचे बोलले जाते, पण कोंडी नक्की कुणाची झाली आहे ते येत्या ७२ तासांत कळेल. सरकारची कोंडी झाली आहे असे विरोधकांना वाटणे साहजिकच आहे. म्हणून स्वतः विरोधकांकडे तरी या प्रश्नाचा काही तोडगा आहे काय? मराठा आरक्षणाच्या कोंडीत जसे सरकार फसले आहे तसे विरोधकही फसले आहेत. संभाजीनगरातील एक तरुण प्रमोद पाटील याने मराठा आरक्षणप्रश्नी सोमवारी आत्महत्या केली. एखाद्या प्रश्नावर लोक मरायला आणि मारायला तयार होतात त्या वेळी सरकारबरोबरच विरोधक म्हणवून घेणार्‍यांच्याही बुडाखाली चटके बसल्याशिवाय राहत नाहीत. महाराष्ट्रात सध्या तसे घडते आहे. अर्थात राममंदिरप्रश्नीही लोकांनी असेच जीव गमावले, रक्ताचे पाट वाहिले, तरीही रामाचे मंदिर उभे राहिले नाहीच. शेवटी रामाच्या अयोध्या निवासाचा प्रश्न हा न्यायालयात गेला व लोंबकळून पडला. राममंदिर हा श्रद्धेचा विषय आहे व श्रद्धेचे निवाडे न्यायालयात होत नसतात. त्याचप्रमाणे मराठा आरक्षण हा कायदे व नियमांचा विषय राहिला नसून तो पोटापाण्याचा विषय बनला आहे. पोटापाण्याचा विषय हा न्यायालयात सुटू शकत नाही. तो राज्यकर्त्यांनीच सेडवायचा आहे. त्यासाठी ५६ इंच छातीची गरज आहे. सरकारतर्फे मराठा आरक्षणाचे घोंगडे मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावर टाकले जात आहे. हे वेळकाढू धोरण आहे. मागासवर्गीय अहवालाशिवाय नवे आरक्षण देता येईल व राज्यघटनेच्या बदलांचे नंतर पाहता येईल. पुन्हा

हे आरक्षण फक्त

मराठा समाजाचे नाही. महादेव कोळी, धनगर समाजही याप्रश्नी उभा ठाकला आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय झाला की धनगर, महादेव कोळी वगैरे समाज रस्त्यावर उतरतील आणि नवा सामाजिक बखेडा उभा राहील. त्यामुळे आरक्षणाबाबत ज्या ज्या समाजाच्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्यांचा एकत्रित विचार करून त्याबाबत एकमताने निर्णय घेणे हाच योग्य मार्ग आहे. नाहीतरी धनगर समाजास घटनेत बदल करून आरक्षण देऊ, असा शब्द सत्ताधारी भाजपने निवडणुकीपूर्वी दिलाच आहे. तेव्हा आज मराठा समाज, उद्या धनगर, परवा कोळी असे समाज एकापाठोपाठ एक रस्त्यावर उतरले तर महाराष्ट्राचे ‘बनाना रिपब्लिक’ व्हायला वेळ लागणार नाही. खरे म्हणजे सरकारने सगळ्यांच्याच रोजगाराची, पोटापाण्याची व्यवस्था केली असती तर आज जो सामाजिक भडका राज्यात उडाला आहे तो उडाला नसता, पण समाजाला खूश करणे म्हणजे त्या समाजातील एखाद्या नेत्यास एखाद्या खुर्चीवर चिटकवणे हेच होत असते. तसे आधी काँग्रेसवाले करीत होते, आता भाजपवाले करतात. समाजाचे अशांत मन स्थिर राहावे म्हणून भारतीय जनता पक्षाने ‘सोशल इंजिनीयरिंग’ साधण्याचा प्रयत्न केला. रामदास आठवले यांना मंत्री केले, महाराष्ट्रात धनगर समाजाचे महादेव जानकर यांना मंत्री बनवले तर विकास महात्मे यांना राज्यसभेत आणले. तसे कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना खासदार करून मिटवामिटवीचा प्रयोग केला, पण

पेटलेला वणवा

शांत व्हायला तयार नाही व तथाकथित पुढार्‍यांचे ऐकायला लोक तयार नाहीत. मुख्यमंत्र्यांना कोणी भेटायला गेले व मांडवलीची भाषा केली की, मराठा समाजातर्फे ‘हे आमचे नेते नव्हेत’ असे स्पष्ट केले जाते. हे आंदोलन आज नेत्यांच्या हातात राहिले नसून समाजाचे झाले आहे. त्यामुळे सरकारनेही ‘फोडा, झोडा व आंदोलकांना विकत घ्या’ असे करण्याची भानगड करू नये. १ ऑगस्टपासून मराठा क्रांती आंदोलन जोर पकडेल. ९ ऑगस्टच्या क्रांतिदिनी महाराष्ट्रभर मोठे आंदोलन करू, असेही आंदोलकांतर्फे सांगण्यात आले आहे. हा भडका लवकर विझला नाही तर राज्याचे मोठे नुकसान होईल. पंतप्रधान मोदी हे विष्णूचे अवतार आहेत व मुख्यमंत्री फडणवीस हे साक्षात ‘देवेंद्र’ आहेत, त्यांच्याकडे जादूची कांडी आहे या भ्रमातून जनतेला बाहेर काढणारे वातावरण सध्या आहे. तेव्हा मराठा आरक्षण प्रश्नावर सरकारने आता फार ताणू नये व विरोधकांनीही बेडक्या फुगवू नयेत. जनतेचा सरकारबाबत भ्रमनिरास झाला आहे आणि त्यातूनच महाराष्ट्रावर ही आफत आली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना वाटले की, विरोधक पंढरपूरच्या वारीत साप सोडतील व घातपात घडवतील, पण वारीत न सोडलेल्या सापाने गारुड्यालाच डंख मारला. वारीत साप सोडण्याची अफवा तुमचीच व पुंगीदेखील तुमचीच. त्यामुळे पुंगी बेसूर वाजते आहे. मराठा असो, धनगर असो किंवा महाराष्ट्रातील वंजारी, महादेव कोळी, गोवारी, जंगम असो, यांना एकत्रित न्याय द्या, हेच आमचे मागणे आहे. या सर्वच मागण्या एकत्र करून एकदाच काय ती शिफारस एकमताने मंजूर करून संसदेकडे पाठवा. सामाजिक न्यायाची पुंगी गाजराची पुंगी ठरू नये. प्रश्न पोटातील आगीचा आहे. पोटाला जात चिकटवण्याची वेळ सरकारने आणली आहे.

Related posts

राफेल विमान कराराची कागदपत्रे गहाळ झाली, याचा अर्थ ती खरी होती !

News Desk

कमलनाथ यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती

News Desk

सॅम पित्रोदा यांना गांधी परिवाराची सर्व गुपिते माहित आहेत !

News Desk