HW News Marathi
मुंबई

कापडी पिशव्यासाठी पालिकेला ५ कोटी रुपये निधी देणार

मुंबई | गुढीपाडव्यापासून राज्यभरात प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे. नागरिक बाजारपेठत गेल्यानंतर फळ-भाज्या किंवा इतर वस्तू खरेदी केल्यास त्यांना सहजपणे उपलब्ध होणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या बंद झाल्या आहेत. यामुळे नागरिकांना अडचणी निर्माण होऊ नये. यासाठी कापडी पिशव्या बाजारात आण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. यासाठी पालिकेला ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसेभेत सांगितले.

मुंबईच्या समुद्रात प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा साचलेला आहे. तसेच पावसाळ्यात पाणी तुंबण्यामागचे कारण प्लॅस्टिक असल्याचे रामदास कदम यांनी अर्थसंकल्पीय मागण्यांच्या अनुदानावरील चर्चामध्ये उत्तर देताना बोलत होते. २ जानेवारी रोजी प्लॅस्टिक बंदी संदर्भात अधिसूचना काढण्यात आल्या होत्या. यानंतर गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिक बंदी यांची अंमलबजावणी करण्यात आली. या निर्णयानंतर सर्वच प्रकारच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दाऊदच्या कोट्यवधी संपत्ती विकत घेण्यासाठी 12 जण इच्छुक

News Desk

माज़ी नगरसेवक संतोष उरणकर व त्यांच्या सुविद्य पत्नी भारती उरणकर समर्थकांसह भाजपमध्ये

News Desk

चांदिवलीच्या म्हाडा कॉलनीत संरक्षण भिंत कोसळली

News Desk
महाराष्ट्र

शिवसेनेकडून संकटग्रस्त शेतकऱ्याला मदतीचा हात

News Desk

जालना | पोहेगाव येथील शेतकरी प्रेमसिंग चव्हाण यांच्या हतबलतेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही म्हणून हताश झालेल्या चव्हाण यांनी फावड्याने कोबीचे पिक नष्ट केले होते. परिस्थितीपुढे हतबल होऊन संकटामध्ये सापडलेल्या चव्हाण यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकरी चव्हाण यांना धीर देत स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आर्थिक मदत केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी चव्हाण यांना १ लाख रुपयांचा धनादेश देत मदतीचा हात दिला आहे. या भेटीदरम्यान राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, जिल्हाप्रमुख ऐ. जे. बोराडे, युवासेनेचे विस्तारक अभिमन्यू खोतकर, उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, पंचायत समिती सभापती पांडुरंग डोंगरे आदी उपस्थित होते.

Related posts

सांगलीत गॅगवारमधून शकील मकानदारची हत्या 13 जणांनी केला हल्ला

News Desk

आधी सुसाईड नोट, आता सीडीआरमध्ये पुरावे, पोलीस कसून तपास करणार, महंत नरेंद्र गिरींच्या आत्महत्येचं गूढ उकलणार?

News Desk

महात्मा गांधींविषयी ‘ते’ वक्तव्य भोवलं; अखेर कालीचरण महाराजला अटक

Aprna