HW News Marathi
मुंबई

लोकल ट्रेनमधून ६ वर्षात तब्बल ६० हजार मोबाइल लंपास

मुंबई । मुंबईची लाइफ लाइन असलेल्या लोकल ट्रेनमधून दररोज जवळपास ८० लाखापेक्षा जास्त प्रवासी मुंबई अंतर्गत प्रवास करतात. या लोकलमधील दिवसेंदिवस वाढणाऱ्या याच गर्दीचा फायदा चोरटे घेतांना दिसून येत आहे. मुंबईच्या उपनगरीय लोकल ट्रेनमधून गेल्या ६ वर्षात तब्बल ९९ कोटी ४६ लाख ९६ हजार ९८१ रुपये किमतीचे मोबाईल फोन चोरी झाल्याचे समोर आले आहे. जवळपास ६० हजार मोबाईल फोन चोरट्यांनी लोकल ट्रेनमधून लंपास केले असल्याच या माहीतीतून समोर आलं आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी आरटीआय अंतर्गत ही माहीती समोर आणली आहे. मुंबई पोलीसा विभागाकडे २०१३ ते २०१८ या कालावधीत किती मोबाईल चोरीच्या घटनांची नोंद झाली आहे, त्याचबरोबर किती किमतीचे हे मोबाइल फोन आहे यासंदर्भात शेख यांनी माहीती मागीतली होती. लोहमार्ग पोलीस विभागाच्या माहिती अधिकाऱ्यांनी यासंर्दभातील माहीती शेख यांना दीली आहे.

मात्र यापैकी केवळ १० टक्के मोबाईल फोन परत मिळाले असल्याचे यातून समोर आले आहे. २०१६ पासून २०१६ पर्यंत ६ हजार ६६४ मोबाइल चोरी झाले आहेत, तर २०१७ पासून २०१८ पर्यंत मोबाइल चोरीची संख्येत वाढ होउन या वर्षभरात तब्बल ५३ हजार २४० मोबाइल चोरी झाले असल्याचे या माहितीतून समोर आले आहे. विशेष म्हणजे २०१३ मध्ये दर दिवसाला ३ मोबाईल फोन चोरी झाले तर २०१८ मध्ये या चोरीचे प्रमाण वाढून तब्बल दिवसाला ८९ मोबाइल फोन इतके झाले. मुंबईमध्ये मोबाइल चोरी करणारी एक आंतरराष्ट्रीय टोळी असून हे मोबाईल चोरून इतर देशात विकले जातात, यावर योग्य ती कारवाइ करण्याची आवशक्यता असल्याचे मत शकील अहमद शेख यांनी व्यक्त केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

….म्हणून शिवसेना सत्तेला चिटकून

News Desk

देहविक्री रोखण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांचा पुढाकार

News Desk

#PulwamaAttack : नालासोपारामध्ये पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ रेल रोको आंदोलन

News Desk