HW News Marathi
मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाणदिनी रिपाइंची जाहीर सभा

मुंबई | भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६२ व्या महापरिनिर्वाणा दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षातर्फे ६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता शिवाजी पार्क दादर येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार असल्याची माहिती रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे. या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइंतर्फे करण्यात आले आहे.

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए) च्या वतीने मागील २८ वर्ष आणि त्याआधी भारतीय दलित पँथरपासून अंदाजे सुमारे ४१ वर्षांपासून दरवर्षी शिवाजी पार्क येथे दि ६ डिसेंबरला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही शिवाजी पार्क येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी रामदास आठवलेंच्या अध्यक्षतेत जाहीर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. रिपाइंचे देशभरातील सर्व राज्यप्रमुख आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे नेते उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पोटच्या मुलीसोबत शारीरिक संबंध-आरोपी अटक

News Desk

शेतकऱ्यांचा संप मागे

News Desk

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आंदोलन

swarit
मनोरंजन

#IndianNavyDay जाणून घ्या कसे आहे भारतीय नौदल

News Desk

भारत—पाकिस्तानदरम्यान १९७१ मध्ये झालेल्या युध्दामध्ये भारताने विजय मिळवला होता. तो विजयोत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी ४ डिसेंबरला नौसेना दिन साजरा केला जातो. यानिमीत्ताने भारतीय नौदलाकडून विविध कार्यक्रमाच आयोजन करण्यात येतं. या कार्यक्रमात सर्वसामान्यांनाही सहभागी होता येतं. पण नौदलाविषयी आपल्याला फारशी माहीती नसते. आज नौदलदिना निमीत्त, भारतीय सागर किनाऱ्यांच संरक्षण करणारे हे नौदल कसे आहेत जाणून घेउया.

Related posts

नारळाच्या करंज्या

News Desk

गांधीजींना पहिल्यांदा कोणी म्हटले महात्मा ?

News Desk

Vijay Diwas : पाकिस्तानचा पराभव आणि भारताच्या विजयाची 10 कारणे

News Desk