HW News Marathi
राजकारण

मुजफ्फरपूरमध्ये राज ठाकरेंविरोधात याचिका दाखल

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी(२ डिसेंबर) उत्तर भारतीय पंचायतने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहून हिंदीतून भाषण केले. त्यानंतर देशभर त्यांनी साधलेल्या या हिंदी भाषेतील संवादाची चर्चा रंगली आहे. परंतु आता त्यांच्या या भाषणाविरोधात याचिका दाखल करण्यात आलेली माहिती मिळाली आहे.

या संबंधित भाषणादरम्यान त्यांनी हिंदी भाषेचा अपमान केला, अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. मुजफ्फरपूरचे सामाजिक कार्यकर्ते तमन्ना हाश्मी यांनी राज ठाकरेंविरोधात मुख्यन्यायाधीश आरती कुमारी सिंह यांच्या खंडपीठापुढे ही याचिका दाखल केली. सदर याचिकेवर १२ डिसेंबर रोजी पहिली सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

या भाषणावेळी उपस्थितांना संबोधित करताना “हिंदी ही राष्ट्रीय भाषा नाही”, असे जाहीर वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. त्यामुळे राज ठाकरे यांनी हिंदी भाषेविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून भाषेचा अपमान केला असल्याचे याचिकेत म्हटले आहे. वास्तविक हिंदी ही भारताची राष्ट्रीय भाषा नाही आणि सरकार दफ्तरी तसा कोणताही पुरावा नाही, अशी माहिती याआधी अनेकवेळा माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. त्याचाच आधार घेऊन राज ठाकरे यांनी ते वक्तव्य केल्याचे समजते. त्यामुळे या याचिकेमागे केवळ वाद निर्माण करण्याचा उद्देश असावा, असं राजकीय विश्लेषकांना प्रथम दर्शनी वाटतं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 73 वा वर्धापन दिन साजरा

News Desk

‘सिल्वर ओक’वर शरद पवार-प्रफुल्ल पटेलांमध्ये चर्चा सुरु

News Desk

आयएनएस सुमित्रावर अक्षय कुमारला घेऊन जाणे बरोबर आहे का ?

News Desk
देश / विदेश

बुलंदशहर हिंसाचारामागच्या मुख्य सूत्रधाराला अटक

News Desk

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यात सोमवारी (३ डिसेंबर) स्यानामधील एका गावातील शेतात मृत गायीचे अवशेष आढळले होते. त्यानंतर येथील लोकांनी संतप्त होऊन रास्ता रोको केले. दरम्यान, बुलंदशहरामध्ये झालेल्या हिंसाचारामागचा मुख्य सूत्रधार आणि ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. योगेश राज असे या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. योगेश हा प्रवीण तोगाडिया यांच्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे.

योगेश राजवर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या भावना भडकविल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. या दंगलीप्रकरणी अजूनपर्यंत तब्बल ७५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी सुबोध सिंह यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांच्या नावांमध्ये योगेश राजसह उपेंद्र राघव (बजरंग दल), शिखर अग्रवाल (माजी अध्यक्ष, भाजयुमो) यांची देखील नावे आहेत.

या हिंसाचारादरम्यान आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १ तरुण गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे संतप्त जमावाने पोलीस स्टेशनची मोठ्या प्रमाणावर मोडतोड आणि जाळपोळ केली. यात पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Related posts

‘नारायण राणेंची रेल्वेमंत्र्यांची घेतली भेट, कोकणवासियांसाठी तीन महत्त्वाच्या मागण्या’

News Desk

लोकशाही धोक्यात – सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचा आरोप

News Desk

भारतीय वायू दलाचा १ पायलट परतलेला नाही | परराष्ट्र मंत्रालय

News Desk