HW News Marathi
मुंबई

ठाण्यात तृतीय पंथीला मनसे कार्यकर्त्याकडून बेदम मारहाण

ठाणे | ठाण्यातील माजिवडा भागात नाशिक महामार्गाला लागून असलेल्या पाईपलाईन लगत झुडुपात देहविक्रय आणि नागरिकांची लूटमार करणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. एका तरुणीला लुटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्याकडून एका तृतीयपंथीयांना बेदम मारहण करण्यात आली आहे.

माजिवडा भागात राहणारी एक तरुणी शनिवारी रात्री कामावरुन परत येत असताना तीन-चार तृतीयपंथीयांनी तिला लुटण्याचा प्रयत्न केला. याबाबत कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी तिला उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा या तरुणीने आरोप आहे.

याबाबत तरुणीने मनसेकडे तक्रार केल्यानंतर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांसह माजिवडा गाठत या तृतीयपंथीयांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही जण पळून गेले, तर एक तृतीयपंथी मनसे कार्यकर्त्यांच्या हाती लागला. या तृतीयपंथीयाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला. यापुढे जर या भागात तृतीयपंथी आढळले तर त्यांना अशाचप्रकारे चोप देण्यात येईल, असा इशारा यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आंदोलन

swarit

डाॅक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना घर सोडण्यास सांगितल्यास होणार कारवाई

swarit

मनोज मेहता यांचा मृत्यू, अंधेरी पुल दुर्घटनेत झाले होते जखमी

News Desk
मुंबई

एलएलएम’च्या परीक्षा पुढे ढकला,विद्यार्थी कोर्टात जाणार

swarit

मुंबई विद्यापीठाच्या ‘एलएलएम’च्या परीक्षा वर्ग सुरू झाल्यानंतर ११ दिवसांनी घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर अभ्यास कधी करणार आणि परीक्षा कशी देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकला अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा स्टुडंट लॉ कौन्सिलने दिला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या ‘एलएलएम’ प्रवेशाची शेवटची प्रवेश यादी १० जानेवारीला प्रसिद्ध झाल्यानंतर १७ जानेवारी रोजी सत्र-१ची परीक्षा ठेवण्यात आली. मात्र विद्यार्थी संघटनांच्या विरोधानंतर ही परीक्षा २२ जानेवारीपासून घेण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. तरीदेखील फक्त ११ दिवसांत अभ्यास करून परीक्षा देणे कठीण असल्याचे सांगत या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा याआधी स्टुडंट लॉ कौन्सिलने याआधीच दिला आहे. यातच आता या परीक्षा पुढे ढकलल्या नाही तर न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले.

Related posts

सभागृहात असे कधीच घडले नाही

News Desk

मुंबईत पेट्रोल नव्वदी पार

News Desk

डोंबिवलीमध्ये शारदा प्रोसेस कंपनीच्या चार मजली गोदामाला आग

News Desk