HW News Marathi
मुंबई

आरेतील आग जाणीवपूर्वक लावली, अग्निशमन दलाचा अहवाल जाहीर

मुंबई | गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीमधील जंगलात ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास भीषण आग लागली होती. मात्र, या आगीमागचे कारण गेले अनेक दिवस स्पष्ट झाले होते. मात्र, आता ते कारण हळूहळू स्पष्ट होत आहे. अग्निशामक दलाकडून बुधवारी (१२ डिसेंबर) जाहीर करण्यात आलेल्या अहवालात आरे कॉलनीतील आग ही लागली नाही तर जाणीवपूर्वक लावण्यात आली आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या आगीबाबत तपास करणाऱ्या पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी करावी, असेही या अहवालात सुचविण्यात आले आहे.

अग्निशामक दलाच्या अहवालात म्हटल्याप्रमाणे, आरेच्या जंगलात अनधिकृतरीत्या काही लोकांची ये-जा झाली असल्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, आग विझल्यानंतर केलेल्या तपासात त्या ठिकाणी अर्धवट जळलेले टायर्स, प्लास्टिक सापडले आहे. त्याचप्रमाणे त्या परिसरातील काही भागांवर या भीषण आगीचा कोणताही परिणाम झाला नाही, याबाबत देखील अग्निशमन दलाने शंका व्यक्त केली आहे.

आरेच्या जंगलातील झाडे आणि कोरड्या गवताने पेट घेतल्याने सुमारे ३ ते ४ किलोमीटर पर्यंतच्या परिसरात ही आग पसरत गेली होती. तब्बल ६ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रात्री साडेबाराच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना ही आग नियंत्रणात आणण्यास यश आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Dahi Handi |उच्च न्यायालयाने दहीहंडी पथकांवर घातले निर्बंध,बाल गोविंदांचा समावेश असल्यास होणार कारवाई

News Desk

मरे’चे रडगाणे सुरूच

News Desk

…मात्र राज्य सरकार गप्प का ? संजय राऊतांचा रोखठोक सवाल

News Desk