HW News Marathi
मुंबई

रेल्वेला फेरीवाल्यांकडून दोन हजार कोटींचा हप्ता

डोंबिवली(प्रतिनिधी): फेरीवाल्यांकडून प्रशासनाला दोन हजार कोटींचा हप्ता मिळतो, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवली येथे पत्रकार परिषदेत केला आहे. मनसेमुळे रेल्वे स्टेशन्सनी मोकळा श्वास घेतला, असेही राज म्हणाले. शेतकरी कर्जमाफी निव्वळ मुर्ख बनवण्याच काम आहे, असे राज ठाकरे म्हणाले. देशाची अर्थव्यवस्था गर्भगळीत झालीय. जीएसटी, नोटाबंदीची काय गरज होती ? असा सवाल राज यांनी केला. सरकार पैसे नसताना योजना जाहीर करतय, खोटेपणाचा फुगवलेला फुगा लवकरच फुटणार असे राज म्हणाले.

दोन दिवसांच्या कल्याण-डोंबिवली दौºयावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडियाचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा आणि त्यांची काम करा असा सल्ला राज यांनी दिला. शुक्रवारी सकाळी सर्वप्रथम राज डोंबिवलीत दाखल झाले. तिथे त्यांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक; मुंबई पालिकेची रणनिती ठरणार?

Aprna

ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने ‘रोजगारमुक्त’ केले, त्यांनी ‘मोदीमुक्त भारता’ची मुक्ताफळे उधळली

News Desk

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची भारतीय मानक ब्युरोवर सदस्यपदी नियुक्ती

News Desk