HW News Marathi
मुंबई

अबू सालेमच्या निकाहाला विघ्न, हायकोर्टाने पॅरोल याचिका फेटाळली

मुंबई | अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम यांच्या ४५ दिवसांचा पॅरोल रजेची मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. हायकोर्टात आज या याचिकेवर सुनावणी झाली. या हायकोर्टाने अबू सालेमची पॅरोल रजेची याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे सालेमच्या निकाह रचण्याचे स्वप्न भंगले आहे.

याआधी सालेमने एप्रिल महिन्यात लग्नासाठी तळोजा कारागृहाच्या प्रशासनाकडे ४५ दिवसांच्या पॅरोलसाठी अर्ज केला होता. परंतु हा अर्ज नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी फेटाळला होता. देखील आलेमने पॅरोलसाठी मागणी केली होती. तेव्हा सुद्धा नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी फेटाळला होता. यानंतर सालेमच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात दाद मागितील आहे. अबूसालेम हा मुंब्रा येथे राहणाऱ्या २७ वर्षीय कौसर बहार या तरुणीशी निकाह करायचा आहे. सालेमच्या आयुष्यात यापूर्वी अभिनेत्री मोनिका बेदीसोबत निकाह केला होता.

अबू सालेमवरील गुन्हे

१९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात अबू सालेमचा सहभाग, देशातील विविध न्यायालयात खटले सुरू आहेत. तर पोर्तुगालमध्ये बनावट पासपोर्ट प्रकरणाचा खटला सुरू आहे. त्यामुळे हायकोर्टाने सालेमची याचिका फेटाळली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

खोणी येथे टेम्पो अपघातात शाळेत जाणा-या एका अल्पवयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू तर दोन जण जखमी

News Desk

घर अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर, 18 तासांनंतरही ‘ते’ घरी परतलेच नाहीत !

News Desk
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, चार जवान शहीद

swarit

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा सामना करताना चार जवान शहीद झाले आहे. दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करणाऱ्या असल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती. यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलेही चकमक अद्याप सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या चकमकीत भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. यात भारतीय लष्कराच्या एका मेजरसह तीन जवान शहीद झाले आहेत. या परिसरात भारतीय लष्कर लपून बसल्याची शक्यता वर्तवली असून येथे लष्कराचे शोधकार्य सुरू आहे.भारतीय लष्कराकडून अधिकृत माहिती येणे बाकी आहे. आणि या जवानांची नावे आणि इतर माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

Related posts

कोरोना काळात नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा अभिनव उपक्रम, मोदी साधणार संवाद

News Desk

पंतप्रधान मोदींना यावर्षीचा सोल शांतता पुरस्कार जाहीर

Gauri Tilekar

सरकारी बँकांचे खासगीकरण होणार, पंतप्रधानांचे संकेत

News Desk