HW News Marathi
मुंबई

मुंबईकरांनी एसी लोकलकडे फिरवली पाठ

मुंबई – बहुप्रतीक्षित एसी लोक ख्रिसमसच्या मुहूर्तावर मुंबईकरांच्या सेवत दाखल करण्यात आली होती. पण, मुंबईकरांनी एसी लोकला चांगला प्रतिसात दिला नसल्याचे दिसून आले आहे. सुरुवातील एसी लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते बोरिवली दरम्यान एसी लोक सुरू करण्यात आली.

१ जानेवारीपासून लोकल चर्चगेट ते विरार नियमित १२ फेऱ्या सुरू करण्यात आल्या असून तरी देखील प्रवाशांकडून हवा तितका प्रतिसात मिळताना दिसत नाही. गेल्या पंधरा दिवसात एसी लोकलमधून फक्त ५३ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. एसी लोकलचे तिकीटचे दर जास्त असल्यामुळे प्रवाशांनी तिच्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे एसी लोकलमध्ये देखील ट्रेनसारख्या फर्स्ट आणि सेकन्ड क्लास असे दोन प्रकार करणार असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.

चर्चगेट ते दादरच्या एसी लोकलचे एकेरी प्रवासासाठी ८५ रुपये तिकीटदर असून चर्चगेट ते विरार एकेरी प्रवासासाठी २०५ रुपये तिकीट दर आहे. एसी लोकलचे तिकीट दर जास्त असल्यामुळे प्रवाशांनी वाट फिरवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अमित शहांनी सहकुटुंब घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

Aprna

कुर्ल्याचा हरियाणा वाला लेन परिसर अंधारात

swarit

पानपट्यावर चॉकलेट, वेफर्स आणि बिस्किट विकण्यास बंदी

News Desk
मुंबई

एलफिस्टन आणि करी रोड पुल फेब्रुवारी महिन्यात खुला

swarit

मुंबई – एलफिस्टन आणि करी रोड येथे लष्कराच्या मतीने बांधण्यात येणारा पादचारी पुल येत्या फेब्रुवारी महिन्यात प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. तसेच एलफिस्टन येथे तांत्रिक आणि करी रोड येथे भूसंपादन कारणांमुळे पुला काम पुर्ण करण्यास उशीर झाला असल्याची माहिती मुंबई दौऱ्यात आलेल्या केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.

एलफिस्टन पूल हा अरुंद असून २९ सप्टेंबर रोजी सकाळी ऐण गर्दीच्या वेळेत चेंगराचेंगरीमुळे २२ प्रवाशांचा मृत्यू आणि ३९ प्रवाशी जखमी झाले होते. या घटनेनंतर मुंबईतील अरुंद पूलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या ठिकाणांच्या पुलाचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी लष्कराच्या मदतीने पादचारी पुल बांधण्यात येणार आहे.

एलफिस्टननेच्या निषेध म्हणून अनेक राजकीय पक्षाकडून अनेक मोर्चे काढण्यात आले होते. तसेच राज्य सरकार आणि रेल्वेकडून दोघांकडून ५ लाखा रुपये मृत व्यक्तींच्या वारसांना एकूण १० लाख रुपयांची मदत देण्यात आली होती. तर गंभीर जखमी १ लाख, किरकोळ जखमींना ५० हजार रुपये आणि जखमींवर मोफत उपचार करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

Related posts

महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवरील सोयीसुविधांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Aprna

अंधेरी पोटनिवडणुकीतील नाराजीच्या चर्चांवर काँग्रेसची प्रतिक्रिया

Manasi Devkar