HW News Marathi
मुंबई

लोकलचे दरवाजे बंद केल्य‍ास कारवाई होणार

मुंबई | मुंबई मध्ये लोकलने प्रवास करणारे प्रवासी यांना बऱ्याचदा कार्यालयीन वेळेत लोकल पकडताना धावपळ होते. त्यातच काही प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याची किंवा उतरण्याची घाई असते. परंतु दरवाज्यावर उभे असलेले प्रवासी बऱ्याचदा लोकल ट्रेन चे दरवाजे बंद करतात.त्यामुळे प्रवाशांना वेळेत कामावर किंवा ईच्छीत ठिकाणी पोहोचण्यास उशीर होतो. अशा प्रवाशांना रेल्वे प्रशासन हिसका दाखवणार आहे. भारतीय रेल्वे प्रशासनानं लोकलचे दरवाजे बंद करणाऱ्या अशा प्रवाशांना गंभीर इशारा दिला आहे. जर लोकलचा दरवाजा बंद केलात आणि तुम्हाला आरपीएफच्या जवानांनी पकडल्यास तुमच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो.

मुंबई पश्चिम रेल्वे प्रशासनानं अशा प्रकारे लोकलचे दरवाजे बंद करणा-या प्रवांशावर नुकतीचं कारवाई केली आहे. पश्चिम रेल्वेनं गेल्या पाच दिवसांत विरार-बोरिवली मार्गावर लोकलचे दरवाजे बंद करणाऱ्या ९४ ते ९५ हून अधिक प्रवाशांवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात आरपीएफच्या जवानांनी लोकलचे दरवाजे बंद करणाऱ्या जवळपास ८५ प्रवाशांना रंगेहाथ पकडले आहे. तसेच फूटबोर्डावरून प्रवास करणं हासुद्धा एक प्रकारचा गुन्हाच आसुन पश्चिम रेल्वेकडे अशा प्रकारच्या अनेक-तक्रारी आल्या असून, त्या सर्व तक्रारी विरार-बोरिवली मार्गावरील आहेत.

पश्चिम रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त ए. के. सिंग म्हणाले कि , दरवाज्यावर उभे राहून अडवणूक करणाऱ्या आणि दरवाजा बंद करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी आम्ही एक विशेष टीम तयार केली आहे. दरवाजा बंद करणाऱ्या टवाळखोर मुलांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच असं काही कृत्य करताना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेनंही डोंबिवली, दिवा आणि ठाणे स्टेशनमध्ये अशा २९ प्रवाशांवर कारवाई केली आहे. त्या मुळे या त्रासापासुन प्रवाशांची सुटक‍ होण्यास मदत होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवाजी पार्कमध्ये कुरियर बॉयचा २ तरुणींवर पेनाने हल्ला

News Desk

अविवाहित शहिद सैनिकांच्या मालमत्तांना मालमत्ता करात सूट

News Desk

मुख्यमंत्र्यांनाच अटक करा संभाजी ब्रिगेडची मागणी

News Desk
मुंबई

स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्षात्रतेज आणि राष्ट्रासाठी प्रेरणा पुरुष !

News Desk

मुंबई | स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्षात्रतेज असून आज ह्याच क्षात्रतेजाची देशाला गरज आहे, ते केवळ आमच्यासाठीच नव्हे तर देशासाठी प्रेरणा पुरुष आहेत, त्यांच्या प्रेरणेची आजच्या नव्या पिढीला गरज असून त्यांच्या विचारांचा त्यांनी अंगीकार केला पाहिजे, ज्याप्रमाणे चाणक्य आणि रामदास स्वामी यांनी राष्ट्राला शिकवण दिली त्या परंपरेतच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्थान आहे, असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी भेट दिली तसेच स्मारकाच्या उपक्रमाविषयी जाणून घेतले. त्यावेळी त्यांनी विचार व्यक्त केले. यापासून आल्यानंतर आम्हाला प्रेरणा मिळते असेही ते म्हणाले.

स्मारकाच्या वतीने राष्ट्रहितासाठी होत असलेल्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली तसेच हे कार्य अधिक व्यापकतेने समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी सदिच्छादेखील दिल्या.

त्यांनी यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले तसेच पुष्प वाहून आदरांजलीही वाहिली.

स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा तसेच त्यांची साहित्यसंपदा त्यांना भेट दिली. स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, पदाधिकारी मुकुंद गोडबोले, महेश कुलकर्णी, व्यवस्थापक संजय चेंदवणकर तसेच सावरकरभक्त व देशप्रेमी नागरिक उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारत विकास परिषद आणि समस्त महाजन संस्थांचे पदाधिकारी व मान्यवरदेखील उपस्थित होते.

Related posts

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पादचारी पूल कोसळला, ५ जणांचा मृत्यू

News Desk

भिवंडीमध्ये कापडाच्या कारखान्याला भीषण आग

News Desk

उद्धव ने निच राजकारण खेळले ….आता हातवर टाळी नाही तर कानाखाली

News Desk