HW News Marathi
मुंबई

यंदा मुंबईकरांची पाण्याची समस्या मिटणार ?

मुंबई | मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी मोडक सागर, तुळशी, विहार, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा ही सातही धरणे ९०% भरली आहेत. या वर्षीच्या पावसाळ्यातील मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. त्यातील मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणारे भातसा धरण ८४% भरले आहे.

त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची समस्या मिटली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी या आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत मात्र मुंबईत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे या वर्षी मुंबईला पाण्याच्या समस्येशी सामना करावा लागणार नाही अशी सध्या चिन्ह पहायला मिळत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मशिदीवरील भोंग्याविरोधात सोनू निगमचा नाराजीचा सूर

News Desk

कल्याण डोंबिवलीत धावणार महिलांसाठी तेजस्विनी बस

News Desk

रेल्वे कर्मचाऱ्यांना खूशखबर ,केंद्र सरकारकडून दिवाळीचा बोनस जाहीर

Gauri Tilekar