HW News Marathi
मुंबई

अदानीकडून मीटर तपासणी न करताच वीजबिलांचे वितरण ?

मुंबई | अदानी कंपनीकडून मुंबई उपनगरात वीजपुरवठा केला जातो. अदानी कंपनीने प्रत्यक्ष मीटरची तपासणी न करताच वीजबिल दिल्याने नागरिक संतापले आहेत. दरम्यान वीजबिलांमध्ये तब्बल ५० ते १०० टक्के दरवाढ करण्यात आल्याच्या तक्रारींची दखल घेत एक समिती स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या ऊर्जामंत्र्याना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे काही मागण्या केल्या आहेत. या मागण्या पुढीलप्रमाणे :

  • अदानी कंपनीकडून गेल्या तीन महिन्यात देण्यात आलेल्या विजेच्या बिलांचे ऑडिट करण्यात यावे.
  • विजेची बिलं ही मीटर तपासणी करून दिल्याचे पुरावे सादर करावेत.
  • तपासणी न करता सरासरीने पद्धतीने किती बिलं वितरित करण्यात आली आहेत, याची आकडेवारी द्यावी
  • जास्त रकमेची बिलं देण्यात आलेल्या ग्राहकांना याबाबतची माहिती देऊन अतिरिक्त रकमेचा व्याजासहित परतावा द्यावा
  • पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी राज्य वैधमापन विभागाला वीज मीटर आणि बिलांचे ऑडिट करण्याचे निर्देश द्यावेत.
  • राज्य सरकारने या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला याबाबत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत
  • अधिकारी, तज्ज्ञ, ग्राहक संघटना यांची एक समिती स्थापन करून या प्रकरणाची तपासणी करावी.
  • या समितीचा अहवाल ३ महिन्यांत जनतेसमोर मांडावा
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले

News Desk

गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीची स्वच्छता

Manasi Devkar

अंधेरीमधील एसआरएच्या इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू

News Desk