HW News Marathi
मुंबई

चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाला जाग

मुंबई – मुंबईतील परळ-एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाला जाग आली आहे. शनिवारी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात वरिष्ठ अधिका-यांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीनंतर पियुष गोयल यांनी सांगितले की, रेल्वेवरील पादचारी पुलाला 150 वर्षांपासूनची प्रवासी सुविधा असा दर्जा होता. आता यामध्ये बदल करत पादचारी पुलांना अत्यावश्यक सुविधेचा दर्जा देण्यात आला आहे. शिवाय रेल्वेतील महाव्यवस्थापक यांना सुरक्षेबाबत उपाय योजना राबवण्यासाठी सर्वाधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वेच्या निषेधार्थ उपोषण

News Desk

उंदीर मारण्याचे काम १९८४ पासून सुरू

News Desk

आमदारांसाठी राखीव स्टिकरचा गैरवापर

News Desk