HW News Marathi
मुंबई

आज अमित शहा घेणार उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज सायंकाळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ही भेट उद्धव ठाकरे यांच्या निवसस्थान मातोश्री येथे होणार आहे. यात भेटीत शहा आणि ठाकरे यांच्यात आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युती संदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेना पालघर पराभवानंतर आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. मुंबईत भाजपच्या वतीने सुरु असलेले संपर्क अभियानासाठी अमित शहा आज मुंबई दौरा करणार आहेत. या दौऱ्या दरम्यान शहा ठाकरे यांच्या व्यतिरिक्त उद्योगपती रतन टाटा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची देखील भेट घेणार आहे.

  • अमित शहा यांचा मुंबई दौरा
  1. १२ वाजता मुंबई एयरपोर्टवर आगमन
  2. १२:३० वाजता – आशिष शेलार ह्यांना मातृशोक झाल्याने त्यांची आणि त्यांच्या परिवाराची वांद्रे येथे भेट.
  3. १ वाजता – रंगशारदा येथे रावसाहेब दानवे पाटील आणि संगठन मंत्री विजय पुराणिक ह्यांच्याशी चर्चा
  4. ३:३० वाजता – अभिनेत्री माधुरी दीक्षित ह्यांची जुहू येथे त्यांच्या निवासस्थानी भेट
  5. ४:३० वाजता – गानसम्राज्ञी लता मंगेशकर ह्यांची पेडर रोड या निवास्थानी भेट
  6. ५:३० वाजता – उद्योगपती रतन टाटा ह्यांची कुलाबा येथे निवासस्थानी भेट
  7. ७:३० वाजता – मातोश्री येथे उद्धव ठाकरे ह्यांची भेट
  8. ९ वाजता – सह्याद्री गेस्ट हाऊस भाजप राज्य निवडणूक प्रचार समितीची लोकसभा निवडणुक तयारी आणि आढावा बैठक
  9. १०:३० वाजता – वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि संगठण मंत्री विजय पुराणिक यांच्या सोबत चर्चा

 

Related posts

प्रेयसीचा दोनदा गर्भपात करणाऱ्या प्रियकराला अटक

News Desk

रस्त्याच्या रुंदीकरणासाठी हटवलेलं क्रॉस पुन्हा स्थापित

News Desk

पत्रीपूल पाडण्यास सुरुवात, कल्याण-डोंबिवली दरम्यान जबोब्लॉक

News Desk
देश / विदेश

संघ कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही | डॉ. भागवत

News Desk

मुंबई | दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तीन दिवसीय शिबीर पार पडले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकार आणि काँग्रेस सरकारवर निशाना साधला. या दरम्यान, भागवत यांनी देशाच्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले.

शिबीराच्या शेवटच्या दिवशी मोहन भागवत यांनी केंद्र सरकारसह विरोधी पक्षाला उद्देशून एक प्रश्न उपस्थित केला की राजकारणात स्मशान, कब्रस्तान , भगवा आतंकवाद यांसारख्या शब्दांना कशा प्रकारे पाहिले जाते ? यावर उत्तर देताना भागवत म्हणाले, राजकारण हे लोक कल्याणासाठी व्हायला हवे .स्मशान, कब्रस्तान , भगवा आतंकवाद यांसाठी नाही.

पुढे बोलताना भागवत म्हणाले, जेव्हा राजकारणाचा मुख्य उद्देश केवळ सत्ता प्राप्ती असा होतो. तेव्हा ख-या अर्थाने विविध विषयांवर राजकीय पक्ष राजकारण करु लागतात. यावेळी महात्मा गांधी आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा दाखला देत भागवत म्हणाले त्यांच्यासारखे काम केले तर अशा गोष्टींना वाव मिळणार नाही. तसेच पुढे बोलताना भागवत म्हणाले, संघ कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही.

संघाचे मुख्य उद्दिष्ट केवळ नियमांचे पालन करणे हा आहे. लोक संघाच्या धोरणांचा फायदा घेतात. बुधवारी, संघाच्या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी मोहन भागवत यांनी सांगितले की संघ अनुच्छेद 370 आणि 35 ए स्वीकारत नाही. त्यांनी सांगितले की अशी व्यवस्था योग्य नाही.

 

Related posts

पंतप्रधान मोदी आणि नथुराम गोडसे यांची विचारसरणी एकसारखीच !

swarit

मोठी बातमी! भगतसिंग कोश्यारी यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

News Desk

स्वदेशी ‘तेजस’ विमानातून लष्कर प्रमुखांचे उड्डाण

News Desk