HW News Marathi
मुंबई

मुंबईकरांना यंदाचा पावसाळाही जीव मुठीत घेऊन काढावा लागणार

धनंजय दळवी | येत्या आठवड्याभरात मुंबईत कधीही पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. मुंबईत यावर्षी तब्बल ४९९ इमारती धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाचा पावसाळाही हजारो मुंबईकरांना धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन काढावा लागणार आहे. गेल्या वर्षी धोकादायक इमारतींची संख्या ६१९ होती. घाटकोपर इमारत दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक इमारती जर्जर झालेल्या आहेत. या इमारती कधीही कोसळतील अशी परिस्थिती आहे. येथील अनेक जुन्या इमारतींना टेकू लावण्यात आले आहेत. त्यामुळे रहिवासी जीव मुठीत घेऊन येथे वास्तव्य करत आहेत.

एल. वॉर्डात मधील कुर्ला विभागात २५ इमारती धोकादायक परिस्थितीत आहेत. यामध्ये ५ इमारती अतिधोकादायक पातळीत मोडतात. तर १२ इमारती धोकादायक परिस्थितीत आहेत. या सर्व इमारती ४५ ते ८० वर्षात मोडतात. यामधील ८० वर्ष जुनी असलेली इमारतीमध्ये ३२ कुटुंब आणि दोन दुकानं येतात. अश्या अनेक धोकादायक इमारती या परिसरात आहेत. येथील कुटुंब जीव मुठीत घेऊन जगत आहेत.

त्याचप्रकारे के पश्चिम वॉर्डात म्हणजे अंधेरी पश्चिम, विलेपार्ले भागात सर्वाधिक म्हणजे ५७ इमारती धोकादायक आहेत. त्यानंतर टी वॉर्डात म्हणजे मुलुंड, भांडूप या भागात ४७ इमारती धोकादायक आहेत. बी विभागात केवळ एकच इमारत धोकादायक आहे. कोर्ट कज्जे आणि इतर कारणांमुळे बहुतांश इमारती धोकादायक इमारती रिकाम्या करणं मनपाला शक्य झालेलं नाही.

जी – उत्तर वॉर्डात सर्वात कमी धोकादायक इमारती

मुंबईत यावर्षी तब्बल ४९९ इमारती धोकादायक असल्याचे समोर आले पण पालिकेच्या जी – उत्तर वॉर्डात सर्वात कमी धोकादायक इमारती आहेत. या वार्डात एकूण ७ इमारती धोकादायक असल्याची माहिती मिळाली. त्यापैकी ३ इमारती कोर्ट प्रकरणात आहेत, २ इमारती जमीन दोस्त करण्यात आल्या आहेत, तर २ इमारतीची वीज आणि पाणी कापण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील सर्वात कमी धोकादायक इमारती या वार्डात आहेत.

पावसाळ्यात धोकायदायक इमारती कोसळून कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, याची काळजी घेताना दरवर्षी पालिकेकडून ३० वर्ष किंवा त्याहून जुन्या इमारतींचं सर्वेक्षण केलं जातं. सी-वन, सी-टू आणि सी-थ्री अशा तीन प्रकारांत धोकादायक इमारतींचे वर्गीकरण केले जाते. सी-वन प्रकारातील इमारती या राहण्यास धोकादायक असतात.

मुंबईमध्ये अशा घटना झालेल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे :

१. बाबू गेनू मंडईजवळ कामगार वसाहत इमारत

जुलै २००७, बोरीवली, मुंबई

लक्ष्मी छाया इमारत कोसळली, २९ रहिवाशांचा मृत्यू

२. जून २००८, मुंबई

कुंभारवाडा परिसरातील दत्त निवास इमारत कोसळली, २९ जणांचा मृत्यू

३. जून २०१३, माहीम, मुंबई

माहीम दर्ग्याजवळ अल्ताफ इमारत कोसळली, १० जणांचा मृत्यू, ६ जखमी

४. एप्रिल २०१३, मुंब्रा, ठाणे शीळ डायघरमधील अनधिकृत इमारत कोसळली

७४ जणांचा मृत्यू, ५० हून अधिक जखमी

५. सप्टेंबर २०१३, माझगाव डॉकयार्ड, मुंबई बाबू गेनू मंडईजवळ कामगार वसाहत इमारत कोसळली ६१ जणांचा मृत्यू.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टँकरधारकांनी मुंबईतील पाणीपुरवठा तत्काळ सुरु करावा; मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

Aprna

सॅनिटरी पॅडस वरीलGST(कर) रद्द करा राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे GST भवनवर आंदोलन

swarit

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk