HW News Marathi
मुंबई

विघटनवादी शक्तींना सत्तेवरून दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीः खा. अशोक चव्हाण

मुंबई संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष आपला लढा अधिक तीव्र करणार असून विघटनवादी शक्तींना सत्तेवरून दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन खा. चव्हाण म्हणाले की, सत्ताधारी पक्ष सामाजिक वातावरण गढूळ करून त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करित आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पोलिसांकडून पाळत ठेवली जात आहे. पण काँग्रेस पक्ष अशा प्रकारांना घाबरणार नाही. संविधान वाचले तरच हा देश वाचेल, त्यामुळे संविधान बदलण्याचे कारस्थान करणा-या या सरकारविरोधातील लढा आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

टिळक भवन येथे पार पडलेल्या या सोहळ्याला विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील,विधानपरिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री सुरेश शेट्टी, खा. हुसेन दलवाई,आ. शरद रणपिसे, आ. भाई जगताप, आ. हुस्नबानो खलिफे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, अनुसूचीत जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, यशवंत हाप्पे, राजन भोसले युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे, यांच्यासह पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सीएसएमटी पूल दुर्घटना : रेल्वे-महापालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

News Desk

नऊ तासांत तिनशे मिलिमीटर पाऊस

News Desk

गोपीनाथ मुंडेंचा वाढदिवस 12 डिसेंबरला नाही – अजित पवारांचा गौप्यस्फोट

News Desk
मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला इंदूमिलची जागा देण्यासाठी 15 वर्ष लागले कुणी बांधले होते का ? : देवेंद्र फडणवीस

swarit

मुंबई, आज जे संविधान बचाव रॅली काढत आहेत, त्यांचे हात कमला मॉलसाठी मिल कामगारांच्या जमिनी देण्यासाठी अतिशय वेगाने सरसावले होते. पण, तेच हात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदूमिलची जागा देताना अचानक कसे मंदावतात, हेही या महाराष्ट्राने गेली 15 वर्ष अनुभवले आहे, अशी जोरदार टीका आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

भाजपाच्या अतिभव्य तिरंगा एकता रॅलीच्या निमित्ताने कामगारमैदानावरील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, संविधान स्वत:च सक्षम आहे, त्याला तुम्ही काय वाचविणार? मुळात दुरूपयोग करता येईल, इतके संविधान कच्चे नाही. सत्तेत असताना याच संविधानाची शपथ घ्यायची आणि भ्रष्टाचार करायचा आणि विरोधात बसले की स्वत:चे पक्ष वाचविण्यासाठी याच पवित्र संविधानाचा आसरा घ्यायचा. राजकारण हे इतक्या नीच पातळीचे नसावे. ज्या ज्या वेळी संविधानावर आघात करण्याचे प्रयत्न झाले, तेव्हा तेव्हा संविधानानेच त्यांना दंडित केले. इंदिरा गांधींच्या आणिबाणीचे उदाहरण अजूनही लोक विसरले नाहीत.

आज ज्यांनी संविधान बचाव रॅलीचे आयोजन केले, त्यासाठी 18 पक्ष एकत्र आले. पण, ते केवळ 1800 लोक जमवू शकले आणि एकट्या भाजपाने जेव्हा तिरंग्याचा सन्मान करण्यासाठी लोकांना आवाहन केले, तेव्हा कामगारमैदान पहा कसे गच्च भरले आहे, हेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. संविधानाचा सन्मान खर्‍या अर्थाने करायचा असेल तर तो शेवटच्या घटकाच्या उन्नतीत आहे. गरिबांना घरे, महिलांना स्वयंपाकाचा गॅस, युवकांना मुद्रा कर्ज हे सारे काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे घडत आहे. संविधान हा आमचा धर्म आहे. आम्ही सत्ता उपभोगायला सरकारमध्ये नाही तर सेवा करण्यासाठी आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आज राज्यभरात सुमारे 3000 वर ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तिरंगा एकता यात्रांचे आयोजन केले होते, या सर्व ठिकाणी प्रचंड प्रतिसाद लोकांनी दिला.

Related posts

…अन् खेळता खेळता जीव गेला

News Desk

पुढच्या १ महिन्यात मुंबईतील १५७ पुलांचे ऑडिट सादर करा, महापालिकेचा आदेश

News Desk

रामदास आठवले लोकसभा निवडणूक मुंबईतून लढणार

News Desk