HW News Marathi
मुंबई

रामदास आठवले लोकसभा निवडणूक मुंबईतून लढणार

मुंबई | रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे २०१९ साली म्हणजेच आगामी लोकसभा निवडणूक मुंबईतून लढणार आहेत. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून रामदास आठवले रिंगणात उतरणार आहेत. याबाबत वांद्रे पूर्व येथे रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा रामदास आठवलेंनी घेतला.

या मतदारसंघात स्थानिक कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेशही आठवलेंनी दिले आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या ६१ व्या स्थापना दिनानिमित येत्या ३ ऑक्टोबर रोजी ठाण्यात महामेळावाचे आयोजिन करण्यात आले आहे. या महामेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी रामदास आठवलेंनी मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात रिपाइंचे मुंबईतील सर्व जिल्हा अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सध्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. यापूर्वी ते पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर शिर्डी येथे लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले २००९ मध्ये पराभूत झाले होते. मात्र १९९८ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार लोकसभेत निवडून गेले होते. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील चेंबूर, अणुशक्तीनगर, धारावी, नायगाव, वडाळा हे आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले मानले जातात. या भागात आठवलेंच्या रिपाइंची संघटनात्मक बांधणीही आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

यंदा मुंबईकरांची पाण्याची समस्या मिटणार ?

News Desk

राज्यातील हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

News Desk

आशिष शेलार मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष

Aprna
मुंबई

भर पावसात डबेवाल्यांची सेवा सुरु

News Desk

मुंबई | पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अगदी पावसाच्या सलामीलाच मुंबईत जागो जागी पाणी भरले आहे. शुक्रवारी पहाटेपासून मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत वर्षाचे 12 महिने मुंबईकरांना वेळेत डबा पोहचविणारे डबेवाले मात्र भर पावसात काम करताना पहायला मिळत आहे.

उन,वारा,पाऊस जरी असला तरी मुंबईचा डबेवाला मात्र आपली डबे पोहचविण्याची सेवा देण्यासाठी जीवाचा आटापिठा करत असतो. शनिवारी सकाळी भर पावसात भायखळा-राणीबाग या विभागात जेवणाचे डबे देण्याचे काम रोहीदास सावंत हे डबेवाले हसत हसत करत असल्याचे दिसून आले.

शनिवारी 1 नंतर मुंबईत पावसाने अधिकच जोर धरल्याचे दिसून आले. तरीही दुपार नंतरच्या जेवणानंतर रिकामे झालेले डबे तुंबलेल्या पाण्यातून मुंबईचे डबेवाले जमा करत असल्याचे दृश्य शनिवारी पहायला मिळाले. मुंबईतला कर्मचारी जर उन्हाळ पावसाळा काम करु शकतो तर मुंबईचा डबेवालाही त्यांना तितक्याच तत्परतेने जेवन वेळेत पोहचविण्याची मेहनत घेतो असे मत मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी व्यक्त केले.

Related posts

माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा घसरली

News Desk

अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचारप्रकरणी शिपाई अटकेत

News Desk

कंगना विरोधात दाखल करण्याचे आदेश, धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप

News Desk